शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
3
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
4
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
5
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
6
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
7
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
8
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
9
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
10
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
11
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता
12
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
13
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
14
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
15
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
16
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
17
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात हा दिला उमेदवार
18
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
19
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज सरकारचा क्रूरपणा, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 9:05 PM

मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी सरकारची चौकशी नको तर कारवाई हवी- विजय वड्डेटीवार यांची मागणी

जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली इथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला, हा सरकारचा क्रूरपणा आहे.आधी फडणवीस सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले.महायुती सरकार आल्यावरदेखील नुसत्या बैठका झाल्या, पण कारवाई झालीच नाही. मतांसाठी मराठा समाजाची फसवणूक या सरकारने केली, हे मराठा समाज विसरणार नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली.

याआधी राज्यात मराठा समजाचे पाच - दहा लाखांचे मोर्चे निघाले, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवली नव्हती. आताच का मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज करण्यात आला? मराठा आरक्षण देऊ शकत नाही हे माहीत असल्यामुळेच महायुती सरकार हे आंदोलन चिरडत आहे, अशी टीकाही वड्डेटीवारांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, दीड वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर महायुती सरकारने काहीच केले नाही, त्यामुळे आज समाजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. पण त्याही आंदोलनात लाठीचार्ज करून सरकारने त्यांची मराठा आरक्षण प्रती आपली नियत दाखवली. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्क आहे, अस असताना आंदोलनकर्त्यांनावर बळाचा अती वापर  झाल्याचे दिसत आहे. आंदोलनकर्त्यांना जखमी करणाऱ्यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे. या आंदोलनकर्त्यांनावर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले हे ही सरकारने स्पष्ट केले पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी चौकशीची घोषणा केली, पण अश्या अनेक चौकश्या होतात. नवी मुंबई महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रकरणी पण चौकशीची घोषणा झाली पुढे झाले काहीच नाही. त्यामुळे जालना प्रकरणी देखील चौकशी नको कारवाई हवी. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी इंद्रा सहानी प्रकरणातील ५० टकके आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी लागेल. त्याशिवाय आरक्षण देता येणार नाही हे आता स्पष्ट आहे.केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही याबाबत धोरणात्मक निर्णय होत नाही यातून सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित होते असेही विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार म्हणाले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा