शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
3
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
4
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
5
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना- हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी यांची प्रतिक्रिया
6
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
7
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
8
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
9
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
10
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...
12
Bharti Airtel करणार Tata Group सोबत मोठी डील, टाटांची 'ही' कंपनी खरेदी करण्याची तयारी
13
Haryana Election Result : "हरयाणात नक्कीच काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल...", विनेश फोगाटचा दावा
14
गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते? 
15
हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....
16
Eknath Shinde News : मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, कारण...
17
YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)
18
"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
19
मोदी बागेत रणनीती! सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये चेहरा लपवणारा 'ती' व्यक्ती कोण?
20
Bigg Boss 18 : "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे", 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?

अल्पवयीन मुलींच्या हत्येत महाराष्ट्र देशात आघाडीवर

By admin | Published: October 11, 2015 4:11 AM

एकेकाळी स्त्री भ्रूणहत्येने राज्य हादरले असताना त्यापाठोपाठ आता, चिमुरडींच्या हत्येच्या घटनांमध्ये राज्य आघाडीवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

-  मनीषा म्हात्रे, मुंबईएकेकाळी स्त्री भ्रूणहत्येने राज्य हादरले असताना त्यापाठोपाठ आता, चिमुरडींच्या हत्येच्या घटनांमध्ये राज्य आघाडीवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे मुली वाचवा, अशी म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आंतरराष्ट्रीय कन्या दिन देशभरात उद्या (रविवारी) साजरा होत असताना त्यांच्या सुरक्षेबाबत शासनस्तरावर गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. ‘मुलगी नको, वंशाचा दिवा हवा, म्हणून मुलींची गर्भाशयातच हत्या केली जात होती. यामुळे दरहजारी मुलींच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट होत असताना, शासनाने यावर कडक भूमिका घेतल्याने त्यावर काही प्रमाणात रोख आणणे शक्य झाले आहे. मात्र त्यातच आता सहा वर्षांखालील चिमुकल्यांच्या हत्येच्या गुन्ह्यात राज्य आघाडीवर असल्याने मुलगी वाचविण्यासाठी पुन्हा एकदा पुढे येण्याची गरज भासत आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या गेल्या वर्षाच्या आकडेवारीनुसार, ६ वर्षांखालील मुलींच्या सर्वाधिक हत्या ६२ महाराष्ट्रात झाल्या आहेत. या चिमुरडींच्या हत्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल तामिळनाडू (३४), उत्तर प्रदेश (२७), मध्य प्रदेश (२६) यांचा क्रमांक आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार कमी करण्यासाठी आणि आरोपींना जरब बसवून जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी देशामध्ये ‘पॉस्को’ कायदा करण्यात आला. तसेच अल्पवयीन मुले हरवल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेशसुद्धा न्यायालयाने दिले. असे असले तरी अल्पवयीन मुलींच्या अत्याचारांमध्ये घट न होता अत्याचारांंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. देशाची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण, लंैगिक अत्याचार असे दर दिवसाला किमान तीन ते चार गुन्हे दाखल होतात. या वर्षीच्या ४ आक्टोबरपर्यंत ३२२ मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत.कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचेमुलींच्या अत्याचारांच्या घटनांवर रोख आणण्यासाठी शासनाने कायद्यामध्ये कठोरता आणली आहे. मात्र याची अंमलबजावणी योग्य रीतीने होत नसल्याने मुलींच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशात समाजाने यासाठी पुढाकार घेऊन मुलगा, मुलगी यातील भेदाबाबत असलेली वृत्ती बदलणे गरजेचे आहे. याची सुरुवात प्रत्येक कुटुंबीयांनी त्यांच्या स्वत:पासून करणे गरजेचे आहे.- कुमार निलेंदु, क्राय संस्थामुलीची हत्या ही गंभीर बाब : अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांची जितकी जबाबदारी आहे तितकीच ती त्यांच्या कुटुंबीयांचीदेखील आहे. इतर देशांतील पालक आपल्या लहान मुलांना कधी एकटे घरात सोडत नाहीत. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष असते. त्यात अल्पवयीन मुलींच्या हत्येतील वाढ ही गंभीर बाब असून याबाबत ठोस पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे नवनिर्वाचित पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ’लोकमत’शी बोलताना दिले आहे. प्रत्येक पाल्य हा त्यांच्या कुटुंबीयांची खरी मालमत्ता आहे विशेषत: म्हणजे मुलगी. यासाठी सर्वांनी पुढे येऊन याबाबत पुढे येणे गरजेचे असल्याचे आवाहनही त्यांनी केले.