शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 12:02 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं असून, भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता आहे, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं असून, भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता आहे, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. 

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की,  नरेंद्र मोदी यांचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं आहे. भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या या लाडक्या नेत्यावर उपचार करणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही. दहा वर्षे जी व्यक्ती पंतप्रधानपदावर बसलेली आहे. नेतृत्व करत आहे. जे तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांनी देशाचं भवितव्य, देशाचा विकास, या विषयावर आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत. मला तिसऱ्यांदा का निवडून द्यायला पाहिजे, यासाठी माझ्याकडे ही ब्लू प्रिंट आहे, असं सांगितलं पाहिजे. मी दहा वर्षांत ही कामं केली आहेत, हे सांगितलं पाहिजे. मात्र मोदींनी एकाही प्रचारसभेत अशी भूमिका मांडल्याचं दिसलं नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली आहे. जेव्हा पंतप्रधानपदावरील व्यक्ती प्रचाराच्या निमित्ताने काहीही बोलू लागले. तेव्हा त्यांची प्रकृती बरी नाही, असे दिसते. त्यांच्या प्रकृतीला काहीतरी त्रास आहे आणि भाजपाने त्यांना तातडीने प्रचारातून बाजूला करून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष दिलं पाहिजे. पंतप्रधानांची प्रकृती बरी नसल्याचं दिसतंय. ते सतत ज्या प्रकारची वक्तव्य करताहेत ते चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही. काल ते कुठेतरी परत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार नाहीत, असं विधान त्यांनी केलं. हे त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे. तेलंगाणात जाऊन त्यांनी काँग्रेस पक्ष हा अदानी आणि अंबानींकडून यांच्या काळ्या पैशावर निवडणुकी लढवताहेत. राहुल गांधी यांना या उद्योगपतींकडून टेम्पो भरभरून पैसा मिळतोत, असं विधान मोदींनी केलंय. ज्याने अदानीला संपूर्ण देश विकत घेण्यासाठी मदत केली. सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली. उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. तेच मोदी जेव्हा त्यांच्या आर्थिक आश्रयदात्यांवर टीका करू लागले आहेत, ते पाहता ते पराभूत झाले आहेत. मोदींनी केलेले आरोप खरे असतील तर त्यांनी पीएमएलए कायद्याद्वारे या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी खिचडी घोटाळ्यावरून केलेल्या टीकेबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ४ जूनपर्यंत तुम्हाला जे तांडव करायचं आहे ते करा. त्यानंतर आम्ही तुमचे सगळे घोटाळे बाहेर काढू. एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारावर बोलावं हे फार मोठं आश्चर्य आहे. स्वत: केलेल्या भ्रष्टाचाराला घाबरून ज्या माणसानं पलायन केलं. स्वत:चे घोटाळे उघड होत असल्याने अटक होईल या भीतीने ज्याची गाळण उडाली, पाय लटपटू लागले. डोळ्यातून अश्रू काढले, असा माणूस भ्रष्टाचारावर बोलतो, हे गमतीशीर आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ahmednagar-pcअहमदनगर