शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 09:08 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपाने अब की बार ४०० पार असा नारा देत प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र ही घोषणा आता भाजपासाठी (BJP) अडचणीची ठरताना दिसत आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje Chhatrapati) यांनीही ४०० पारच्या दाव्यावरून भाजपावर टीका केली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने अब की बार ४०० पार असा नारा देत प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र ही घोषणा आता भाजपासाठी अडचणीची ठरताना दिसत आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने मोदींना ४०० हून अधिक जागा ह्या संविधानामध्ये बदल करण्यासाठी हव्या असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच हा दावा खोडून काढताना मोदी आणि भाजपाची दमछाक होत आहे. दरम्यान, काँग्रेसचेकोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेमध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी ४०० पारच्या दाव्यावरून भाजपावर टीका केली आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, तुम्ही कधी विचार केलाय की चारशे पार म्हणजे काय? चारशे पार ही धोक्याची घंटा आहे. ते २७२ का म्हणत नाहीत? ५४३ खासदारांमध्ये निम्मं करा ना तुम्ही? म्हणजे २७२ होतात. ठीक आहे २७२ म्हणायला अवघड होतं मग ३०० म्हणा. पण ४०० का? ४०० पार म्हणजे संविधान त्यांना बदलून टाकायचं आहे. त्यांना कायदा दुरुस्ती नाही तर कायदा बदलायचा आहे, असा घणाघाती आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यापासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्व नेत्यांनी ४०० पारची घोषणा आणि संविधान बदलण्यावरून मोदी आणि भाजपाला घेरले आहे. तसेच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्ता आल्यास राज्यघटना बदलण्याची आणि ते संपविण्याची योजना आखली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४