शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

उमेदवारी उशिरा जाहीर होणे भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 11:16 AM

Maharashtra Lok Sabha Election 2024: १५ जागांवर उमेदवार उभे केले, त्यापैकी सात जागांवर आमचा विजय झाला. त्या तुलनेत आमची कामगिरी चांगली राहिली. नवीन राजकीय समीकरणे होती. या सगळ्या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. मात्र, या सगळ्या निवडणुकीच्या काळात आमच्या उमेदवारांची उमेदवारी उशिरा घोषित होणे याचा आम्हाला जोरदार फटका बसल्याचे दिसून येत आहे.

- डॉ. मनीषा कायंदे(प्रवक्त्या, शिंदेसेना ) 

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधक आमच्यावर टीका करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात ते आठ जागांवर बोळवण केली जाईल, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, मुख्यमंत्री त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी १५ जागांवर उमेदवार उभे केले, त्यापैकी सात जागांवर आमचा विजय झाला. त्या तुलनेत आमची कामगिरी चांगली राहिली. नवीन राजकीय समीकरणे होती. या सगळ्या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. मात्र, या सगळ्या निवडणुकीच्या काळात आमच्या उमेदवारांची उमेदवारी उशिरा घोषित होणे याचा आम्हाला जोरदार फटका बसल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक अर्ज भरण्याच्या काही दिवस अगोदर आमच्याकडे उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे प्रचारासाठी खूप कमी वेळ उमेदवारांना मिळाला. विरोधकांनी त्यांचे उमेदवार महिनाभर आधीच जाहीर केले होते. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी चांगला वेळ मिळाला. ज्याठिकाणी आमच्या जागा आहेत, त्याठिकाणी सहकारी पक्ष त्या जागेची मागणी करत राहिले आणि तो तिढा सोडविण्यात वेळ गेला. या गोष्टींचा उमेदवार निवडीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी आमच्या विद्यमान उमेदवारांबाबत नकारात्मक सर्वेक्षण असल्याचे सांगून आयत्यावेळी उमेदवार बदलायला लावले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्हाला त्रास झाला. हे सर्वेक्षण कोणी केले, कुठून केले, याबाबत मला काही माहीत नाही. मात्र या कारणांमुळेही अनेक ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाल्याचे दिसून आले आहे. जर पालघर, यवतमाळ, वाशिम याठिकाणी आमचे उमेदवार दिले असते तर आजचा निकाल वेगळा दिसला असता.

     उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किती मराठी मते मिळाली, याचा शोध घेणे गरजेचे आहे.      ठाकरे यांच्या पक्षाला अल्पसंख्याक समाजाची मते अधिक प्रमाणात मिळाली.      संविधान बदलणार हे चुकीच्या पद्धतीने ‘नॅरेटिव्ह’ विरोधकांनी जनमानसात तयार केले. त्याचाही फटका आम्हाला बसला.      सहकारी पक्ष म्हणून भाजपची चांगली साथ मिळाली. अजित पवार गटाचा किती फायदा झाला, हे तपासावे लागेल.     मुख्यमंत्र्यांनी सहकारी पक्षाचे सर्व उमेदवार निवडून यावेत, यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली होती.     लोकसभा निकालाचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. 

सजग राहावे लागेलज्या चुका लोकसभा निवडणुकीत झाल्या त्या टाळायच्या असतील तर नवीन रणनीती आखावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. तसेच पुन्हा अधिक जोमाने मेहनत करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणूक नजीकच आहे. या पार्श्वभूमीवर सजग राहून कष्ट घेऊ. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shiv Senaशिवसेना