शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 15:41 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रचारसभा आज कोल्हापुरात होत आहे. या प्रचारसभेपूर्वी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. या टीकेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आज कोल्हापुरात होत आहे. या प्रचारसभेपूर्वी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. शिवरायांच्या गादीविरोधात प्रचारासाठी मोदी कोल्हापुरात येत आहेत. शाहू महाराजांना बिनविरोध निवडून देण्याचा आमचा प्रयत्न होता. पण मोदी येथे शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्या टीकेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शाहू महाराजांना महाविकास आघाडीने राज्यसभेवर का पाठवले नाही, असा सवाल हसन मुश्रिफ यांनी विचारला आहे.

संजय राऊत यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना सहन मुश्रिफ म्हणाले की, वास्तविक पाहता आमच्या छत्रपतींचा फार मोठा अपमान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये शाहू महाराज छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवलं असतं तर त्यांचा फार मोठा सन्मान झाला असता, शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून त्यांना दारोदारी हिंडवून, महाविकास आघाडीने त्यांचा फार मोठा अपमान केला आहे, असा टोला हसन मुश्रिफ यांनी लगावला.

मोदींच्या आजच्या सभेवरून कोल्हापूरमध्ये सोशल मीडियावर ‘भीती गादीची म्हणून सभा मोदींची’, असा मजकूर व्हायरल होत आहे. त्याबाबत विचारले असता हसन मुश्रिफ म्हणाले की, सन्मान गादीला आणि मत मोदीला हे आपण आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही गादीचा सन्मानच करतोय. मात्र मत मोदींना देणार आहोत, असेही मुश्रिफ यांनी सांगितले.

दरम्यान, महायुतीच्या उमेदवारांसाठी आज कोल्हापूरमध्ये होत असलेल्या सभेवर टीका करताना संजय राऊत म्हणाले होते की, छत्रपती शाहू आणि त्यांच्याआधीचे सगळे या गादीचे वारसदार यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान आहे. त्यामुळे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कोल्हापूरमधून उमेदवार उभं करणंच चूक आहे. छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्रातील शाहू, फुले, आंबेडकरांच्या परंपरेचा सन्मान करावा, अशी आमची इच्छा होती. कोल्हापूरची जागा शिवसेनेची होती. तरी आम्ही शाहू महाराज निवडणुकीला उभे राहताहेत हे ऐकल्यावर ती जागा त्यांच्यासाठी सोडली. पण भाजपाकडून नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येताहेत. नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधात प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते हे महाराष्ट्राची जनता  कधीच विसरणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले होते. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीHasan Mushrifहसन मुश्रीफSanjay Rautसंजय राऊतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४