शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

महाराष्ट्र, मध्य प्रदेशात सर्वाधिक बालगुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 12:39 AM

देशात दरवर्षी बालगुन्ह्यांची सरासरी ३५ हजार प्रकरणे समोर येतात. यातील एक तृतीयांशहून अधिक प्रकरणे केवळ महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील असतात

नितीन अग्रवाल / नवी दिल्ली देशात दरवर्षी बालगुन्ह्यांची सरासरी ३५ हजार प्रकरणे समोर येतात. यातील एक तृतीयांशहून अधिक प्रकरणे केवळ महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील असतात, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर यांनी बुधवारी लोकसभेत दिली. किशोरवयीन मुलांकडून गुन्हे होण्याचे सर्वाधिक प्रकार महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात घडत आहेत. भाजपचे कपिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना अहिर यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या तीन वर्षांत देशभरात एकूण १,३३,१२१ किशोरवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. यात महाराष्ट्रातील २२,६१० आणि मध्यप्रदेशातील २३,०३७ मुलांचा समावेश होता. २०१३ च्या तुलनेत २०१४ आणि २०१५ मध्ये दोन्ही राज्यांत बालगुन्ह्यांच्या प्रमाणात थोडी घट झाली आहे. यादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांच्या संख्येत मध्यप्रदेशमध्ये वाढ, तर महाराष्ट्रात घट झाली. मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीमागील कारणांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अहिर म्हणाले की, सरकारने याबाबत कोणताही अभ्यास केलेला नाही. बालसुधारगृहांची स्थिती सुधारण्यासाठी गेल्या वर्षी १५ जानेवारीपासून नवा कायदा आणण्यात आला आहे, असेही हंसराज अहिर म्हणाले.