Latest Marathi News Live: अखेर पत्र निघालं; या तारखेच्या आत होणार जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:50 IST2026-02-25T08:57:52+5:302026-02-25T17:50:48+5:30
महाराष्ट्रासह देश आणि विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Latest Marathi News Live: अखेर पत्र निघालं; या तारखेच्या आत होणार जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी
Today's Maharashtra Live Updates in Marathi 25 February 2026:अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनी रडारवर होती. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे पुरावे समोर आले होते. त्यांच्या कार्यप्रणालीत गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेऊन DGCA ने कंपनीच्या चार विमानांच्या उड्डाणावर तात्पुरती बंदी आणली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच पुरवणी मागण्यांना लगाम घातला आहे. आर्थिक शिस्तीच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात काही मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. अमेरिका इराण यांच्यातील तणाव अद्याप निवळलेला नाही. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडने सेमी फायनल गाठली आहे. या आणि अशा सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
25 Feb, 26 : 05:45 PM
माजी नगरसेवकाच्या मुलाकडून जबर मारहाण व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अदखलपात्र गुन्हा
उल्हासनगरात शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने एका चामडी पट्ट्याने जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर चौफर टिका झाली. मारहाण झालेल्या इसमाच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाला असून त्यानंतर इसम गेला कुठे? याचा शोध पोलीस शोध घेत आहे.
25 Feb, 26 : 05:36 PM
अखेर पत्र निघालं; या तारखेच्या आत होणार जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी
राज्यातील १२ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समितीचे सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम २० मार्च २०२६ च्या आत घेण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
25 Feb, 26 : 05:35 PM
व्ही. आर.एस. व्हेंचर्स, त्यांचे संचालक व इतर यांचेविरूद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस, मुंबई येथे तक्रार
आज दिनांक २५/०२/२०२६ रोजी रोहित राजेंद्र पवार, आमदार, विधानसभा, महाराष्ट्र राज्य यांनी 'मेसर्स व्ही. आर.एस. व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, त्यांचे संचालक व इतर यांचेविरूध्द् मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे, मुंबई येथे तक्रार अर्ज सादर केला आहे. वरीलप्रमाणे प्राप्त तक्रार अर्जातील घटनेच्या अनुषंगाने दिनांक २८/०१/२०२६ रोजी बारामती तालूका पोलीस ठाणे, जि. पुणे येथे अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ११/२०२६, कलम १९४ भारतीय न्याय संहिता, २०२३ अन्वये नोंद करण्यात आला असून त्या प्रकरणाची पुढील सखोल चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून करण्यात येत आहे. तसेच आज रोजी प्राप्त तक्रार अर्जामधील विषयदेखील वरील घटनेच्या संबंधाने असल्यामुळे सदरचा तक्रार अर्ज पुढील कार्यवाहीकरीता राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे अग्रेषित करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.
25 Feb, 26 : 05:33 PM
उल्हासनगर महापालिकेचा शिक्षण मंडळासह अन्य विभाग वडलँड इमारतीत हलविले, गैरप्रकाराची शक्यता
उल्हासनगर शिक्षण मंडळाचे तत्कालीन प्रशासन अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा, विभागात चोरी, गैरप्रकार आदीमुळे वादात सापडलेल्या शिक्षण मंडळ विभाग वूडलँड मधून महापालिका मुख्यालय येथे हलविण्यात आले होते. प्रशासक राजवट संपवून लोकशाही सुरू होताच शिक्षण मंडळ विभाग पुन्हा वूडलँड इमारती मध्ये हलविल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
25 Feb, 26 : 05:31 PM
समोर वनविभागाचे 'बचाव' धडे, मागे बिबट्याचा तरुणावर हल्ला
एकीकडे वनविभाग बिबट्यापासून बचावाचे धडे देण्यासाठी गावात जनजागृतीपर चित्रफीत दाखवत असतानाच, दुसरीकडे त्याच घराच्या मागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका तरुणावर झडप घातल्याची थरारक घटना धमदीटोला (ता. कुरखेडा) येथे २४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता घडली. या हल्ल्यात सदानंद धरमदास उईके (३२) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडलेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे
25 Feb, 26 : 04:43 PM
लोकांच्या जीवाशी खेळ; फळांना लावलं उंदीर मारण्याचं औषध
मुंबईच्या मालाडमध्ये फळविक्रीशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही विक्रेते फळांवर उंदीर मारण्याचं औषध लावून ती बाजारात विकत असल्याचा आरोप आहे. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकला असता. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत दुकान सील केलं असून दोन आरोपींना अटक केली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर
25 Feb, 26 : 04:27 PM
धनंजय मुंडे यांच्या आमदारकी रद्द करण्याच्या याचिकेवर पुढील सुनावणी ६ मार्चला
राज्याचे मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या आमदारकीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी ६ मार्च रोजी होणार आहे. आतापर्यंत अर्धी सुनावणी पूर्ण झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्या करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, येत्या तारखेपासून पुराव्यांसह मुख्य सुनावणी सुरू होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, कायदेशीर लढा सुरूच राहील आणि आमदारकी रद्द होईल, असा विश्वास व्यक्त केला. धनंजय मुंडे मंत्री होण्याची स्वप्ने पाहत आहेत, मात्र त्यांची आमदारकी जाणार आहे, असा दावा देखील करुणा शर्मा यांनी केला.
25 Feb, 26 : 04:25 PM
नाशिक मनपाच्या स्थायी समितीवर भाजपचा झेंडा; सानप बिनविरोध
नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून, भारतीय जनता पक्ष चे मच्छिंद्र सानप यांची नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी कुंभमेळा च्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे राहणार आहेत. “कुंभमेळा प्रभाग क्रमांक ३ मध्ये होणार आहे. माझे बालपण याच प्रभागात गेले असून, मी हा चौथा कुंभमेळा पाहत आहे. मागील वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळा यशस्वी पार पडला होता. यावेळीही सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करू,” असा विश्वास नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी व्यक्त केला. सानप यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आर्थिक कारभाराची धुरा भाजपकडेच राहणार आहे.
25 Feb, 26 : 04:24 PM
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारवर जोरदार टीका
जालना येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत इशारा दिला आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाला भाजपपासून दूर जाऊ द्यायचे नसेल तर त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा 2029 मधील निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसतील. त्यांनी राज्य सरकारसह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. जरांगे यांनी सातारा संस्थानच्या गॅझेटीयर संदर्भात शासन निर्णय (जी.आर.) कधी काढणार, असा सवाल उपस्थित केला. तसेच, अधिकाऱ्यांकडून मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र दिले जात नसल्याची तक्रार करत, यासाठी सरकारने स्पष्ट परिपत्रक काढावे, अशी मागणी त्यांनी केली. विखे पाटील यांनी समाजाचा विश्वास टिकवावा आणि आपली प्रतिमा खराब होऊ देऊ नये, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
25 Feb, 26 : 04:22 PM
नांदेड येथे भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
भारतीय मजदूर संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांच्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठीचे व्यासपीठ असलेली इंडियन लेबर कॉन्फरन्स गेल्या दहा वर्षांपासून बंद असून ती तात्काळ सुरू करावी, तसेच त्रिपक्षीय समित्यांचे गठन करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय देशभरातील सर्व कामगारांना किमान वेतन लागू करून नॅशनल मिनिमम वेज त्वरित जाहीर करावा, ईपीएस 95 अंतर्गत निवृत्त कामगारांना मिळणारी एक हजार रुपयांची पेन्शन वाढवून ती पन्नास हजार रुपये करावी व महागाई भत्ता लागू करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आरोग्य, पेन्शन व सामाजिक सुरक्षेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
25 Feb, 26 : 04:21 PM
मराठी शाळा वाचवण्यासाठी AISFचा विद्यार्थी मोर्चा
राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे, या विरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्या नेतृत्वामध्ये अमरावतीत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा बंद ठेवत फुले,शाहू,आंबेडकर यांच्या वेशभूषा साकारत हातात संविधानाची पुस्तक घेत विद्यार्थ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, यावेळी मोर्चादरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांनी पथनाट्य देखील करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, पटाच्या आधारावर शिक्षकांची संख्या ठरवणारे धोरण रद्द करावे, कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद समायोजन करण्याचे शासन निर्णय रद्द करावे,शिक्षकांना अध्यापन व्यतिरिक्त इतर कामावर गुंतवणूक नये, हिंदी विषय सक्तीचा लादु नये, केरळ राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
25 Feb, 26 : 04:21 PM
सचिन जाधव कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले
बीडमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जीएसटी अधिकारी सचिन जाधव यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधव यांच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल होऊन तब्बल ४० दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सचिन जाधव यांच्या पत्नी मयुरी जाधव यांनी आपल्या लहान मुलांसह तसेच सासू-सासरे आणि इतर कुटुंबीयांसोबत थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आरोपींना तात्काळ अटक करावी आणि न्याय मिळावा, अशी त्यांची ठाम मागणी आहे.
25 Feb, 26 : 04:20 PM
केडीएमसी अभिलेखा कक्षातून ‘युसूफ हाइट्स’ इमारतीची फाईल चोरी प्रकरण
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अभिलेखा कक्षातून बेकायदा ‘युसूफ हाइट्स’ इमारतीसंदर्भातील महत्त्वाची फाईल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फाईल गहाळ झाल्याने महापालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाणे यांनी तपास सुरू केला असून फॉरेन्सिक पथक कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात दाखल झाले आहे. फाईल नेमकी कशी आणि कुणी चोरी केली, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे केडीएमसीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
25 Feb, 26 : 04:20 PM
मनसेचा शहरातील मूलभूत सुविधांसाठी मनपा प्रशासनाला निवेदन
भिवंडी शहरातील मूलभूत समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनपा प्रशासनाविरोधात भूमिका घेतली आहे. मनसे शहराध्यक्ष डॉ. मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी विविध विभागांना स्वतंत्र निवेदने देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली. जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील कार्यपद्धती, अनियमित पाणीपुरवठा आणि वाढती वाहतूक कोंडी यांसारखे प्रश्न उपस्थित करण्यात आले. मनसेच्या निवेदनात भिवंडी मनपा जन्म-मृत्यू नोंदणी विभागावर गंभीर आरोप करण्यात आले असून, नागरिकांना आवश्यक दाखले वेळेत मिळत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. अर्ज केल्यानंतर अनेक दिवस कार्यालयाचे फेरे मारावे लागत असल्याने सर्वसामान्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
25 Feb, 26 : 04:19 PM
काँग्रेसचे मोदी सरकारविरोधात ‘नरेंद्र सरेंडर’ आंदोलन
मोदी सरकारविरोधात “नरेंद्र सरेंडर” अशी जोरदार घोषणाबाजी करत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवनसमोर आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर देशहिताशी तडजोड केल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. अमेरिकेतील एपस्टाईन प्रकरण, चीनसमोर मवाळ भूमिका तसेच लोकशाही दडपल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत भाजप सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली व संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
25 Feb, 26 : 04:18 PM
पोलीस कोठडी संपल्यानंतर एआय समिटमध्ये आंदोलन करणाऱ्या चार आरोपींना आज कोर्टात केलं हजर
पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर एआय समिटमध्ये आंदोलन करणाऱ्या चार आरोपींना आज कोर्टात केलं हजर
#WATCH | Indian Youth Congress AI Summit Protest Case: Four accused- Krishna Hari, Kundan Yadav, Ajay Kumar and Narasimha Yadav, brought to Delhi's Patiala House Court after their five-day police custody ended today pic.twitter.com/FVWO7KRSe7
— ANI (@ANI) February 25, 2026
25 Feb, 26 : 04:18 PM
मटणावरून दोन गटांत हाणामारी; १३ जणांना अटक
छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा पोलीस ठाणे हद्दीत उधारीच्या पैशांच्या वादातून दोन गटांमध्ये मारहाणीची घटना घडली. मटण दुकानावर पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी आपल्या मित्रांना बोलावल्याने तणाव अधिक वाढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून परिसरात शांतता आहे.
25 Feb, 26 : 03:18 PM
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही, गरिबांचे पैसे कुठे? वडेट्टीवार यांचा सवाल
राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून गरिबांना मिळाली नाही. या योजनेसाठी हक्काचा निधी मिळालेला नाही. या गंभीर मुद्द्यावरून आज विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरले. तीन पावसाळे झाले, लोकं कुठे राहत असतील याचा विचार करा. सरकार म्हणून जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवा,अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला
25 Feb, 26 : 02:55 PM
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर..
मुंबई महानगरपालिकेचा वर्ष २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगराणी यांनी आज महापालिकेत सादर केला. मुंबई मनपाचा यंदाचा अर्थसंकल्प ८० हजार ९५२ कोटींवर गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईच्या अर्थसंकल्पात ८.७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मुंबईचा अर्थसंकल्प ७४ हजार ४२७ कोटी रुपये इतका होता.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज ₹४३१५९.४० कोटी इतके प्रस्ताविण्यात आले होते ते १४६७७८.१२ कोटी असे सुधारण्यात आले असून, अंदाजामध्ये ८.३८% म्हणजेच ₹३६१८.७२ कोटी इतकी वाढ झाली आहे. दिनांक ३१.०१.२०२६ पर्यंत ₹३४०३३.५६ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता अंदाजित महसुली उत्पन्न ₹५१५१०.९४ कोटी इतके प्रस्ताविले असून ते सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत १९.३५% ने जास्त आहे.
25 Feb, 26 : 02:37 PM
सोलापुरात गाडी लावण्याच्या वादातून शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड?
सोलापूर येथे शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्याक जिल्हाप्रमुखांची सिनेस्टाईल गुंडागर्दी समोर आल्याचा आरोप करण्यात येत आहे. ऑफिसच्या बाजूला गाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून थेट चारचाकी गाडीची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मुस्ताक शेख यांचा गाडी फोडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
25 Feb, 26 : 02:08 PM
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक; कोणत्या नेत्यांची नावे दिल्लीत पोहोचली?
१० राज्यांमधील ३७ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी आता मोर्चेबांधणी सुरू आहे. सध्या राज्यातही जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपाच्या बैठका सुरू आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपकडे राज्यसभेसाठी अनेक राज्यसभेसाठी दावेदार आहेत. पण सध्या भाजपाकडे चार जागा आहेत. राज्यातील सात जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले या चार जागांपैकी एका जागी निवडून येणे जवळजवळ निश्चित आहे. दरम्यान आता, राहिलेल्या तीन जागांसाठी अनेकांनी दावा केला आहे. या प्रकरणाबाबत मंगळवारी रात्री उशिरा बैठक झाली. (आणखी वाचा)
25 Feb, 26 : 01:54 PM
मे महिन्यात विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होणार
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधान परिषदेतील ९ जागा येत्या मे महिन्यात रिक्त होणार आहेत. त्यात भाजपाच्या ४, काँग्रेस ३ आणि सेनेच्या २ जागांचा समावेश आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार या जागांवर निवडणूक होणार असून महायुतीचे विधान परिषदेतील संख्याबळ वाढण्याची शक्यता आहे. अधिक वाचा
25 Feb, 26 : 01:51 PM
"विमान अपघातांचा मुद्दा संसदेच्या अधिवेशनात उचलणार"
अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा संसदेत मांडणार आहोत. सगळ्याच विमानाचं ऑडिट झालं पाहिजे. कंपन्यांनी नियम पाळलेच पाहिजेत. कोणाची मनमानी चालणार नाही. अजितदादांचा अपघात, झारखंड अपघात यावर सविस्तर चर्चा आणि सरकारचं उत्तर आलं पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
25 Feb, 26 : 01:51 PM
एकनाथ शिंदेंनी केली सलीम खान यांच्या तब्येतीची विचारपूस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेत्रा सलमान खानशी फोनवरून संवाद साधला. या संवादात शिंदे यांनी सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मागील काही दिवसांपासून सलीम खान यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती सलमानने एकनाथ शिंदे यांना दिली.
25 Feb, 26 : 01:24 PM
'एपस्टीन फाइल्स'मध्ये नाव येताच उचललं टोकाचं पाऊल
जगातील सर्वात शांत आणि विकसित देशांपैकी एक असलेल्या नॉर्वेच्या राजकारणात सध्या एका नावाचा मोठा भूकंप झाला आहे. नॉर्वेचे माजी पंतप्रधान आणि नोबेल शांतता समितीचे माजी अध्यक्ष थोरबजॉर्न जगलँड यांनी कथितरित्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुख्यात अमेरिकन गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी असलेल्या संबंधांमुळे आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे ते सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर होते. या संकटामुळे नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. (अधिक वाचा)
25 Feb, 26 : 01:03 PM
रोहित पवार आणि पोलिसांमध्ये शाब्दीक वाद
आमदोर रोहित पवार आणि आमदोर अमोल मिटकरी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत. त्यांनी व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी रोहित पवार आणि आमदार मिटकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
25 Feb, 26 : 12:34 PM
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
२८ जानेवारी महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी काळा दिवस होता. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात झाला त्याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे. DGCA कडून मंगळवारी एक अहवाल आला. त्यात VSR कंपनीतील त्रुटी समोर आल्यानंतर DGCA ने या कंपनीची लिअरजेट विमाने उड्डाण करण्यास बंदी आणली. मात्र त्या अहवालातही या कंपनीला वाचवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करण्यात आला. VSR कंपनी चूक असेल तर DGCA चीही चूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. VSR कंपनीच्या मालकाला अटक केली पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली. (अधिक वाचा)
25 Feb, 26 : 12:22 PM
पीएम मोदींच्या इस्त्रायल दौऱ्यावर प्रियांका गांधींचा निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर काँग्रेसने बुधवारी टीका केली. 'संपूर्ण जग इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर टीका करत असताना, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'प्रिय मित्रा' सोबत केलेली भेट नैतिक भ्याडपणा दर्शवते. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनीही निशाणा साधला. पंतप्रधान इस्रायली संसदेत भाषण करतील आणि गाझामधील हजारो निष्पाप पुरुष, महिला आणि मुलांचा 'नरसंहार' उल्लेख करतील आणि त्यांच्यासाठी न्याय मागतील अशी त्यांना आशा आहे, असा टोला प्रियांका गांधी यांनी लगावला. (अधिक वाचा)
25 Feb, 26 : 12:02 PM
शरद पवार यांना २ दिवसाच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सौम्य डिहायड्रेशन झाल्याच्या तक्रारीमुळे रविवारी (दि. २२) शहरातील रूबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर आज त्यांना रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दोन दिवस त्यांना द्रवपदार्थ दिले जात होते.
25 Feb, 26 : 11:59 AM
अजित नवले यांच्यासह शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईकडे रवाना
विविध मागण्यांसाठी अकोले तालुक्यातून निघालेल्या लॉंग मार्चनंतर राज्य सरकारकडून आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यानुसार शेतकरी नेते अजित नवले यांच्यासह शिष्टमंडळ आज मुंबईकडे रवाना झाले आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथून निघालेले ‘लाल वादळ’ अहिल्यानगरच्या दिशेने प्रस्थान केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व अजित नवले करत असून विविध श्रमिक संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
25 Feb, 26 : 11:57 AM
राष्ट्रपतींचा दौरा; शेगावात अभेद्य सुरक्षा कवच! ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आज २५ फेब्रुवारीला होणाऱ्या शेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण शहरात अभेद्य सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. तब्बल ३० जिल्ह्यांतील पोलिस पथके, ३२ स्वान पथके आणि सुमारे तीन हजार पोलिसांचा ताफा शेगावात दाखल झाला असून, शहराला अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील प्रमुख चौक, प्रवेशद्वार, बसस्थानक परिसर, तसेच मुख्य रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
25 Feb, 26 : 11:06 AM
धुळे–सुरत महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारच्या पाच-सहा पलट्या, एकाचा मृत्यू
विसरवाडी जवळ धुळे–सुरत महामार्गावर एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. भरधाव स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला असून हा संपूर्ण प्रकार परिसरातील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कारचा वेग इतका प्रचंड होता की चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्यावर पाच ते सहा वेळा पलटी घेतली. या भीषण दुर्घटनेत आकाश पाटील या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून रोहित वाघ हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
25 Feb, 26 : 10:48 AM
एकनाथ शिंदेंनी केली सलीम खान यांच्या तब्येतीची विचारपूस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेत्रा सलमान खानशी फोनवरून संवाद साधला. या संवादात शिंदे यांनी सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मागील काही दिवसांपासून सलीम खान यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती सलमानने एकनाथ शिंदे यांना दिली.
25 Feb, 26 : 10:47 AM
दिल्लीचं नाव बदलणार? भाजप खासदाराचं अमित शहांच्या दरबारीपत्र
भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करण्याची विनंती केली आहे.
"दिल्ली" हे नाव शहराच्या सखोल आणि अधिक टिकाऊ वारशापेक्षा मर्यादित ऐतिहासिक काळाचे प्रतिबिंबित करते. इंद्रप्रस्थ हे नाव दिल्याने आधुनिक भारताची राजधानी त्याच्या प्राचीन संस्कृतीच्या पायाशी पुन्हा जोडली जाईल. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे स्थान मानवतेच्या सर्वात जुन्या सांस्कृतिक परंपरेच्या वारशावर उभे असल्याचे प्रतीक असेल, असेही या पत्रात म्हटले आहे.
BJP MP Praveen Khandelwal writes a letter to Union Home Minister Amit Shah requesting the renaming of Delhi as Indraprastha
— ANI (@ANI) February 25, 2026
"...As such, the name "Delhi" reflects a limited historical period rather than the deeper and more enduring legacy of the city. Restoring the name… pic.twitter.com/meJBqxPS9A
25 Feb, 26 : 10:25 AM
अजितदादांच्या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी करा - सुप्रिया सुळे
रोहित पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. रोहितने अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला आहे. रोहितचा मला अभिमान वाटतो. अजित पवारांच्या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
25 Feb, 26 : 10:16 AM
...तर पाकिस्तानी पंतप्रधानांचा जीव गेला असता; ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर भाष्य करताना अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. "जर मी वेळेवर हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानी पंतप्रधानांना जीव गमवाला लागला असता," असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. (अधिक वाचा)
25 Feb, 26 : 10:04 AM
सुनेत्रा पवार बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार
बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
25 Feb, 26 : 09:37 AM
वसई रेल्वे मार्गावर दुर्दैवी अपघात; शेतकऱ्याचा मृत्यू
भिवंडी – भिवंडी तालुक्यातील खारबाव नजीक भिवंडी–वसई रेल्वे मार्गावर दुर्दैवी अपघात झाला. चिंचपाडा येथील रहिवासी, शेतकरी चंद्रकांत जाऊ पाचमारे (वय 55) यांचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
25 Feb, 26 : 09:21 AM
पोर्नोग्राफिक कंटेंटवर कारवाई करण्यासाठी सरकारने पाच ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक केले
केंद्र सरकारने मंगळवारी अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेट प्रसारित करणाऱ्या पाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने योग्य प्रक्रियेनंतर पाच ओटीटी प्लॅटफॉर्म, मूडएक्सव्हीआयपी, कोयल प्लेप्रो, डिजी मूव्हीप्लेक्स, फील आणि जुगनू यांना ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला आहे.
25 Feb, 26 : 09:05 AM
'दादांचा जीव तुमच्या चुकांमुळे गेला; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून आता सत्तेतील आणि विरोधातील दोन्ही बाजूंनी संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भाषेत केंद्र सरकारच्या 'DGCA' यंत्रणेवर निशाणा साधला आहे. "दादा गेल्यानंतर आता तुम्हाला चुका दिसत आहेत का?" असा सवाल त्यांनी विचारला आहे.
आदरणीय दादा गेल्यानंतर DGCA ला यातल्या चुका दिसल्या का ? दादांचा जीव हा तुमच्या याच चुकांमुळे गेला आहे... गुन्हा कोणावर दाखल केला आहे? अटक कोणाला केली आहे? फक्त विमानाची उड्डाण थांबून दादा परत येणार आहेत का? आमचा हा लढा इथेच थांबणार नाही... आता कार्यवाही झाल्या नाही तर दादांवर… pic.twitter.com/QVrv5oslfv
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 24, 2026
25 Feb, 26 : 09:04 AM
वर्षा बंगल्यावर खलबतं, राज्यसभेवर भाजपा कुणाला देणार संधी?
राज्यसभा जागेसाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा भाजपात आघाडीवर आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात प्रमुख नेते हजर होते. या बैठकीत भाजपाकडून रामदास आठवले, विनोद तावडे, विजया रहाटकर आणि अन्य नावांची चर्चा करण्यात आली आहे.