शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

नारायण राणेंची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली; २ महिन्यात सगळी चक्रे फिरली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:32 AM

जूनच्या सुरूवातीला राज्यसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पक्षाची मते दाखवूनही अपक्ष, घटक पक्षांच्या जीवावर भाजपाने तिसरा उमेदवार निवडून आणण्यास यश मिळवलं.

मुंबई - राज्याच्या राजकारणात २९ जूनचा दिवस राजकीय भूकंप घडवणारा ठरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे जात राजीनामा सादर केला. ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे भाजपाच्या गोटात आनंद पसरला आहे. पुन्हा एकदा राज्यात भाजपाची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. महाविकास आघाडी सरकार २५ वर्ष टिकेल असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत करत राहिले पण हे सरकार केवळ २.५ वर्षातच पडले अशी चर्चा सुरू झाली आहे. 

त्यातच मागील अनेक महिन्यांपासून भाजपा नेते सरकार पडण्याची डेडलाईन देत होते. अनेकदा भाजपा नेत्यांची खिल्ली उडवण्यात आली. त्यात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच १९ एप्रिल रोजी एक विधान करत मविआ सरकार पडण्याची डेडलाईनची सांगितले. नारायण राणे म्हणाले होते की, आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळे येतात. या वादळांत डुलणारी झाडे फांद्यांसकट मोडून पडतात. राज्यातही तीन पक्षांचे एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री बसले आहेत. ते खोडावर बसले नाही, यामुळे जूनपूर्वीच ते मुख्यमंत्री पदावरून बाजूला होतील, असे वक्तव्य राणे यांनी केले होते. 

त्यामुळे राणेंची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आहे. मे महिन्याच्या अखेरीस राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत चर्चा सुरू झाली. या निवडणुकीत भाजपाने संख्याबळ नसतानाही अतिरिक्त उमेदवार उभे केले. निवडणुकीत दगाफटका बसण्याची शक्यता लक्षात घेता या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मविआचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. या निवडणुकीत राज्यसभेचा उमेदवार मागे घ्या, विधान परिषदेत ५ उमेदवार उभा करा असा प्रस्ताव या नेत्यांनी दिला. परंतु तोच प्रस्ताव फडणवीसांनी मविआ नेत्यांना दिला. तुम्ही भाजपाचा तिसरा उमेदवार राज्यसभेत पाठवून द्या, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याबदल्यात भाजपा विधान परिषदेत पाचवा उमेदवार उभा करणार नाही असं म्हटलं. मात्र महाविकास आघाडी पक्षातील असमन्वयामुळे बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली. 

जूनच्या सुरूवातीला राज्यसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पक्षाची मते दाखवूनही अपक्ष, घटक पक्षांच्या जीवावर भाजपाने तिसरा उमेदवार निवडून आणण्यास यश मिळवलं. त्यानंतर २० जूनच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ५ उमेदवार रिंगणात उतरवले. मविआच्या आमदारांमध्ये असंतोष असल्याने अतिरिक्त उमेदवार उभा केल्याचा दावा भाजपाने केला. नेमकाच हाच असंतोष निकालात पाहायला मिळाला. शिवसेनेसह काँग्रेसही काही मते फुटल्याने भाजपाचा उमेदवार जिंकून आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यात मंत्री एकनाथ शिंदे नॉटरिचेबल झाले आणि शिवसेनेला धक्का बसला. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ आमदारांनी मविआ सरकारपासून फारकत घेतली आणि अखेर २९ जून रोजी सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे नारायण राणेंचे ते विधान अगदी खरे ठरले. २ महिन्यात राजकीय चक्रे वेगाने फिरली आणि राज्यात सत्तांतर घडून आले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ