शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

Narhari Jhariwal: सत्तासंघर्षाच्या निकालाचा दिवस, पण सर्वांचं लक्ष असलेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 8:34 AM

Maharashtra Politics Crisis Eknath vs Uddhav Thackeray News: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ज्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे, असे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

गेल्या ११ महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये आजचा ११ मे हा दिवस निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेत पडलेली फूट, महाविकास आघाडी सरकारचं पतन, एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांची अपात्रता या मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल सुनावणार आहे. त्यामुळे सत्ताधारी शिंदे-भाजपा सरकारसह राज्य आणि देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागलं आहे. मात्र याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ज्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे, असे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल असल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल झाले आहेत. झिरवळ यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ येत आहेत. तसेच ते नाशिकमधील दिंडोरी येथील त्यांच्या गावी नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे. तसेच गावातील नागरिकांनीही ते कुठे असल्याचे माहित नसल्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाचा निकाल लागत असतानाच नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्यानंतर झिरवळ हे त्यांच्या गावी असल्याचे झिरवळ यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काल सुनावणीदरम्यान ही माहिती दिली होती. गुरुवारचा दिवस भरगच्च कामकाजाचा असेल, असे समलैंगिक विवाह प्रकरणावरील बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांना सांगितले. या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल न्या. चंद्रचूड यांनी लिहिलेला, तसेच सर्व न्यायाधीशांची सहमती लाभलेला ५-०, असा सर्वसंमतीचा असेल, असे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, काल प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी सांगितलं होतं की, मी जो काही निकाल दिला होता तो कुठल्याही आकसाने दिला नव्हता. सार्वभौम सभागृह आहे,. ते घटनेवर चालतं. त्या पद्धतीने मी योग्य तो निर्णय दिला होता. त्यामुळे न्यायदेवता माझ्या निर्णयाचा निश्चितच विचार करेल. तसेच तत्कालीन अध्यक्ष मी होतो. अपात्रतेचा निर्णय हा माझ्याकडेच येईल, असा विश्वासही झिरवळ यांनी व्यक्त केला होता. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळNarhari Jhariwalनरहरी झिरवाळNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदे