शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"मोठ्या मनानं देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद दिलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 17:18 IST

५० आमदारांनी वैचारिक भूमिका घेत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आणि आनंद दिंघेंच्या विचारांचा सन्मान सहकारी आमदारांनी केला. त्यांचे आभार आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात जो सत्तासंघर्ष सुरू होता त्याला अखेर मोठा ट्विस्ट मिळाला आहे. भाजपा-शिंदे गट एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. परंतु फडणवीसांनी मास्टरस्ट्रोक मारत थेट पुढील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी मोठी घोषणा केली.

राजभवनात भाजपा-शिंदे गट एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र येत आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचे पाठबळ आहे. ५० आमदार एकत्र आहोत. अडीच वर्षापूर्वी काय घडलं ते सगळ्यांना माहिती आहे. या काळात आम्ही मतदारसंघातील कामे, अडचणी याबाबत वारंवार तत्कालीन मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. आपण एकत्र निवडणुका लढवल्या. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. परंतु आमदारांमध्ये असलेली खदखद, मतदारसंघातील प्रश्न आणि पुढच्या निवडणुकीत लढवणं आणि जिंकणे ही समस्या सांगितले. सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात येणाऱ्या आमदारांची संख्या पाहता आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता होती. महाविकास आघाडीत काही निर्णय घेता येत नव्हते. मर्यादा येत होत्या असं त्यांनी सांगितले. 

तसेच हा वेगळा निर्णय राज्याच्या हितासाठी, महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी घेतला. या निर्णयाला भाजपाने पाठिंबा दिला. जवळपास १२३ संख्याबळ भाजपाकडे आहे. असे असतानाही मुख्यमंत्रिपद ते घेऊ शकले असते. परंतु मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. मोठे मन दाखवलं. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांचे आभार मानतो असंही शिंदे यांनी सांगितले. जे काही घडले जी अपेक्षा राज्यातील जनतेची आहे. ती पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक करू. या राज्याला विकासाकडे घेऊन जाण्याचं काम करू. इतक्या मोठ्या मनाचा माणूस राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत. आत्ताच्या राजकारणात काय होईल हे पाहता. परंतु संख्याबळ असताना पद दुसऱ्याला देणं हा त्याग आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

दरम्यान, ५० आमदारांमध्ये काही मंत्री आहेत. आपापल्या मतदारसंघात ताकदवान आहे. एकीकडे खूप मोठे नेते आहे. एकनाथ शिंदेसारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला. ५० आमदारांनी वैचारिक भूमिका घेत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आणि आनंद दिंघेंच्या विचारांचा सन्मान सहकारी आमदारांनी केला. त्यांचे आभार आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आमदारांनी केले. या आमदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊन देणार नाही. आता आपली ताकद वाढली आहे. मजबूत सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल. हे सरकार लोकांच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा