शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
2
रेल्वे स्थानकावर मनोविकृताचा हल्ला, दोघांचा मृत्यू, दोन जखमी
3
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
4
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
5
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
6
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
7
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
8
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
9
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअड धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
10
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
11
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
12
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
13
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
14
पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये कोळसा खाणीत भीषण स्फोट; ७ मजुरांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
भोजपुरी सिनेमा, पवार कुटुंबाशी नातं, किल्ल्यांची दुरवस्था अन् बरंच काही! अश्विनी महांगडे करणार राजकारणात प्रवेश?
16
बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज
17
Ola Electric Share Price : तेजीदरम्यान Ola Electric च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोकं धरण्याची वेळ, स्टॉक ₹९० च्या जवळ
18
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
19
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
20
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?

'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 12:13 PM

ज्याप्रकारची भाषा राजकारणात वापरली जातेय. त्यांना कान धरून पुन्हा जमिनीवर आणणं हे शिकवणं, सांगणं, समजावून सांगणे हे तुमचं कर्तव्य आहे असं मी मानतो. त्या अधिकार वाणीने तुम्ही बोलू शकता, सांगू शकता असं राज ठाकरेंनी सांगितले. 

पुणे - महाराष्ट्रातील राजकीय भाषा खालच्या स्तराला गेली आहे. या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी केले पाहिजे. कुठल्याही ट्रोलिंगचा विचार करू नका. राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केले आहे. ९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचं राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील सर्वात छोटं भाषण मी आज करणार आहे. साहित्यिकांसमोर आपण काय बोलणार, ज्यांची भाषा ऐकून आम्ही पुढे जातो, त्यांच्यासमोर बोलायचं नसते तर ऐकायचं असते. एवढी उज्ज्वल परंपरा साहित्यिकांशी आहे. महाराष्ट्राचं वेगळेपण इतर राज्यांपेक्षा काय हे इथं दिसून येते. मराठी साहित्य वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल, मदत लागेल त्यावेळी आम्ही आहोत. महाराष्ट्रातले साहित्यिक गेले अनेक वर्ष मी पाहत आलोय. मराठीबाणा प्रत्येकाच्या मनात अंगात रुजलेला असायचा. योग्यवेळी राजकारण्यांना जे ठणकावून सांगणे ही धमक, हिंमत जी काही वर्षापूर्वी होती ती आज कुठे तरी कमी दिसतेय असं वाटतं. महाराष्ट्रात चाललेला जो खेळ, सर्कस झालीय, कुणी विदुषकी चाळे करतंय, मंत्रालयात कुणी जाळ्यावर उडी मारतंय. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी अनेक लोक आहेत त्यांना जाळ्यांशिवाय उड्या मारायला लावलं पाहिजे. ज्याप्रकारची भाषा राजकारणात वापरली जातेय. त्यांना कान धरून पुन्हा जमिनीवर आणणं हे शिकवणं, सांगणं, समजावून सांगणे हे तुमचं कर्तव्य आहे असं मी मानतो. त्या अधिकार वाणीने तुम्ही बोलू शकता, सांगू शकता असं राज ठाकरेंनी सांगितले. 

तसेच आम्ही बोललं ट्रोल होते असं तुम्हाला वाटतं परंतु ट्रोलचा विचार करू नका. मी आजपर्यंत अनेक भाषणे दिली आहे, जे बोलायचे ते बोललो आहे  परंतु सोशल मीडियात ज्या गोष्टी येतात त्या मी वाचायला जात नाही. त्या भानगडीत जात नाही. माझे बोलून झालंय ना, मग विषय संपला. कुठल्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायला मी जात नाही. जे तुमच्यावर प्रेम करतात ते स्पष्टीकरण मागत नाही आणि जे तुमचा द्वेष करतायेत ते तुमचं स्पष्टीकरण ऐकत नाही. साहित्यिकांनी ही भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील राजकीय भाषा इतक्या खालच्या स्ताराला गेली, त्यांना समजवणारं कुणी नाही. ज्यांना बुर्जुग म्हणावे ते त्यांच्या आहारी लागलेत. ही जबाबदारी साहित्यिकांनी हाती घेणे गरजेचे आहे असं आवाहन राज ठाकरेंनी मराठी साहित्यिकांना केले. 

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात सामाजिक चळवळ साहित्यिकांनी उभी करणे गरजेचे वाटते. ज्याप्रकारची भाषा राजकारणात येतेय, आज जी लहान मुले आहेत जे भविष्यात राजकारणात येऊ इच्छितात त्यांना ही भाषा म्हणजे राजकारण आहे वाटतं. वाट्टेल ते बोलतात ते माध्यमे दाखवतात. माध्यमांनी हे दाखवण्याचं बंद केले तर हे बंद होईल. राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी करावे असंही राज ठाकरेंनी सांगितले. त्याशिवाय संजय नाहर यांचं माझ्या वडिलांवर प्रचंड प्रेम, बहुदा त्यामुळेच माझ्यावरही असेल. संजय नाहर हा चळवळीतला माणूस, त्यातून काश्मीरपासून त्यांची संस्था कार्यरत आहे. या ऐतिहासिक वास्तूत मला बोलावलं त्याबद्दल मी आभार मानतो असं राज पुढे म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनMNSमनसेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४