शहरं
Join us  
Trending Stories
1
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
2
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
3
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
4
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
5
"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
6
गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
7
नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'?
8
कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
9
रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...
10
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
11
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."
12
Prajakta Mali : "तुझ्यातला प्रामाणिकपणा, जिद्द..."; प्राजक्ता माळीने केलं सूरज चव्हाणचं झापुक झुपूक अभिनंदन
13
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
14
मॉलच्या मेन गेटमधून आतही जाऊ दिलं नाही, पायऱ्यांवर पाहावी लागली वाट; Zomato चे CEO म्हणाले...
15
"...तेव्हा मला कुणी साधं भेटायलाही तयार नव्हतं..."; Bigg Boss 18 मध्ये गेलेल्या मराठी अभिनेत्रीचा कटू अनुभव
16
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
17
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
18
Share Market Opening : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; Hero, HCL मध्ये तेजी, टायटन, अदानी पोर्ट्स घसरले
19
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
20
Adani's Big Move: अदानींनी सुरू केला भारतातील 'हा' मोठा प्रोग्राम, घरातील गॅस पुरवठ्याचं चित्र बदलणार, कसा होईल फायदा?

"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 8:41 AM

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

Prithviraj Chavan ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा काहीच दिवसात होणार असून महाविकास आघाडी आणि महायुतीने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमात बोलताना सिंचन घोटाळ्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिंचन घोटाळा झाल्याचे कबूल केलं आहे, असं म्हणाले. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल एका कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यावरुन टीका केली. 

छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी त्यावेळी एवढंच विचारले की हे चाललंय काय? एवढा गलथान कारभार आहे का? तुमचं एवढं प्लॅनिंग चुकतंय का? ५०० कोटीत पाच वर्षात पूर्ण होणारं धरण ४० वर्षात अजूनही पूर्ण झालं नाही. एवढ्या वर्षात काय झालं? यासाठी मी याची श्वेतपत्रिका द्या म्हणून सांगितलं. मी हे फक्त पाठबंधारेला सांगितलं. दुर्दैवाने महाराष्ट्रात श्वेतपत्रिकेचा अर्थ चौकशी असा होतो पण तसा नाही, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. 

"आर्थिक पाहणी अहवाल जो सादर केला. त्या अहवालात अशी माहिती होती की गेल्या दहा वर्षात ७० हजार कोटी रुपये खर्च झाले आणि सिंचन हे १८ वरुन १८.१ झाले आहे. म्हणजे सिंचन ०.१ एवढे वाढले. यानंतर अजित पवार यांनी तडका फडकी राजीनामा दिला. त्यावेळी अजित पवार म्हणाले माझ्या विरोधात काहीतरी केलं, ते कोणाच्या विरोधात नव्हतं, तो महाराष्ट्रासाठी हिताचा निर्णय होता. आता आपल्याला राजकीय बोलायचं असेल तर यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्कामोर्तब केला, त्यामुळे मला बोलायच काही कारण नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उमपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.  

काही दिवसातच निवडणुकीची घोषणा होणार

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे पथक दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. आयोगाने तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. त्याची पूर्तता झाल्याचे प्रमाणपत्र राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना निवडणूक आयोगाला सादर करावे लागते. मात्र, या बदल्याच न झाल्याने आणि आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली. काही अधिकारी आपल्या गृहजिल्ह्यात तैनात आहेत. निवडणूक काळात अशा अधिकाऱ्यांची बदली ते रहिवासी असलेल्या जिल्ह्याच्या बाहेर करायची असते, त्याबाबतही आयोगाने केलेल्या सूचनांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचे सांगत, या सर्व बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार