शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

शरद पवार कामाला लागले, बुधवारी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक; जयंत पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 8:03 PM

Maharashtra Politics: 'आमदारांना कशावर सह्या घेतल्या, याची माहिती नव्हती. अनेकजण संपर्कात आहेत.'

Maharashtra Politics: आज महाराष्ट्रातील नागरिकांना पुन्हा एकदा मोठे सत्तानाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बंडखोरी करत आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोरांवर जोरदार टीका केली. 

पाटील म्हणतात, 'आज तुम्ही जे पाहिलं तेच आम्ही पाहिलं. शरद पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सर्वजण शरद पवार यांच्यासोबत आहोत. आज शपथविधीला ज्यांना बोलावण्यात आले होते, त्यांना कशावर सह्या घेतल्या माहिती नव्हती. तिथे होते ते आमदार शरद पवारांसोबत बोलले आहेत. काही जण माझ्यासोबत बोलले आहेत. काही आमदार संभ्रमात होते मात्र आता स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते झालेल्या घटनेचा निषेध करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत,' असं जयंत पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणतात, 'आजच्या कृतीला शरद पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. 5 तारखेला राष्ट्रवादी पक्षाचे राज्यस्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे, तालुका प्रतिनिधी या सर्वांना दुपारी 1 वाजता राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी बोलावलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरला या बैठकीचं आयोजन केले आहे. या बैठकीत शरद पवार आपली भूमिका अधिक स्पष्ट करतील,' असंही पाटील म्हणाले.

'ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांना बरीच मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. ही आश्वासने नेमकी काय आहेत, हे योग्य वेळी सांगू. आठ जणांची काही वेगळी भूमिका होती, ते सतत मांडत होते. ईडी चौकशी दरम्यान, मला निरोप आला का? तो विषय वेगळा आहे, मी नंतर त्यावर भाष्य करणार आहे.' बंडखोरांवर कारवाई करण्याबाबत जयंत पाटील यांनी म्हटले की, 'दुपारच्या घटनाक्रमानंतर कायदेशीर बाबींवर विचार करण्यास संधी मिळाली नाही. कारवाई संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ पुढील निर्णय घेऊ.'

ते पुढे म्हणाले की, 'राज्यात आणखी एक पक्ष फोडण्याचे काम भाजपने केले आहे. सत्तेत असताना आणि बहुमताची गरज नसतानाही विरोधी पक्ष फोडला. आधी शिवसेना फोडली, त्यांचा लढा सुप्रिम कोर्टात गेला. कोर्टाने काय निर्णय दिला ते सर्वांना माहित आहे. राज्यात पुन्हा असं घडेल असं वाटल नव्हत. देशात नऊ राज्य आहेत, जिथे विरोधी पक्ष फोडण्याचे काम होत आहे. विरोधकांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. ऑपरेशन लोटस हे भाजपचे चिन्ह आहे,' अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष