शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जो न्याय दुसऱ्या राज्याला, तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा! खासदार सुप्रिया सुळे यांची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 05:40 IST

राज्यातील काही भागांमध्ये हवा तेवढा पाऊस पडलेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्वातंत्र्य दिनानिमित्त शरद पवार गटातर्फे मुंबईतील प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करून राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रध्वज फडकवला. आजचा दिवस साजरा करताना जो न्याय दुसऱ्या राज्याला तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा, अशी अपेक्षा यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

या वर्षी महाराष्ट्रात मागील वर्षाच्या तुलनेत चांगला पाऊस झाला आहे. परंतु, राज्यातील काही भागांमध्ये हवा तेवढा पाऊस पडलेला नाही. ज्या भागामध्ये पाऊस कमी पडला त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या प्राण्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी तसेच भ्रष्टाचाराचे आव्हान राज्य आणि देशासमोर आहे, असे सुळे म्हणाल्या.

आपल्यासमोरदेखील वर्षापूर्वी एक संघर्ष आला होता. आपण मागील स्वातंत्र्य दिनी इथे होतो तेव्हा ना पक्ष होता, ना चिन्ह होते. तुम्ही सर्व पवार साहेबांच्या सोबत आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारासोबत उभे राहिला. तुमचे सर्वांचे कितीही कौतुक केले आणि आभार मानले तरी कमीच आहेत.

गेल्या वर्षापासून आपण संघर्ष करीत आहोत. आणि शेवटी सत्याचाच विजय होतो. त्यासाठी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आभार मानले पाहिजेत. पक्ष, चिन्ह नसताना महाविकास आघाडीचे ३३ खासदार जनतेने निवडून दिले आहेत. महाराष्ट्राने आपल्याला यश दिले; पण, या यशाबरोबर आपल्याला प्रचंड जबाबदारी दिलेली आहे. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे पालन करावे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनSupriya Suleसुप्रिया सुळे