शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

राज्याला पुन्हा वळवाचा तडाखा, गारपीट, वादळी वाऱ्याने पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 06:50 IST

पुढील दाेन दिवस पावसाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वादळी वारा व विजांच्या कडकडाटात शुक्रवारी झालेल्या वळवाच्या पावसाने राज्याला झोडपले असून वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. राज्यात ३५ जनावरे दगावले असून आंबा, कांदा, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान आणि पशुधन दगावल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसाच्या तडाख्यातून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा वादळी वाऱ्याने उरली-सुरली पिके मातीत गेली आहेत.

शुक्रवारी सकाळपासून राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर वादळी वारा, विजांच्या कडकडाटात अनेक भागांत गारपीट आणि जोरदार पाऊस झाला.

भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू- बुलढाण्यातील काटेल धाम (ता. संग्रामपूर) येथे भिंत कोसळून कृष्णाली बोरकर या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.

विदर्भात मोठे नुकसान- पश्चिम विदर्भात वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला, फळपिके व आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.

वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू- वीज पडल्याने बुलढाण्यातील चितोडा (ता. खामगाव) येथे गोपाल महादेव कवळे (वय ४०), कोल्हापुरात मौजे रेठरे (ता. शाहूवाडी) येथे बाबूराब दादू जाधव (६१) यांचा मृत्यू झाला.

आंब्याचे नुकसान- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. सांगलीतील शिराळा तालुका, कोल्हापूरमधील करवीर, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा तालुका, सातारा जिल्ह्यात अनेक भागांत पावसाची हजेरी होती.

राज्यात ३५ जनावरे ठार- अकोल्यातील माझोड येथे गारांच्या तडाख्याने दहा शेळ्या दगावल्या. यात पळशी खुर्द (ता. खामगाव, जि. बुलढाणा) येथे आठ शेळ्या, सोंडी (ता. सेलू, जि. वर्धा) येथे बैल, पेढी आणि संगम (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथे एक गाय, दोन बैल  ठार झाले. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी