शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

शेतकरी आत्महत्यांमध्ये 42 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

By admin | Published: January 06, 2017 10:51 AM

शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली असून 2014 ते 2015 मध्ये आकडा 42 टक्क्यांनी वाढला आहे. महाराष्ट्रात एकूण 3030 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली असून 2014 ते 2015 मध्ये आकडा 42 टक्क्यांनी वाढला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 2014 मध्ये एकूण 5650 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. या आकडेवारीत मोठी वाढ झाली असून 8007 पर्यंत पोहोचला आहे. देशभरातील अनेक राज्यांना 2014 आणि 2015 मध्ये सलग दोन वर्ष दुष्काळाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रातही शेतक-यांनी सलग दोन वर्ष दुष्काळाला तोंड दिलं आहे. 
 
फक्त एकट्या महाराष्ट्रात एकूण 3030 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. 37.8 टक्के शेतकरी आत्महत्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.त्यानंतर तेलंगणा दुस-या क्रमांकावर आहे. तेलंगणात 1358 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेलंगणामध्ये 1997 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून तिस-या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकमधील एकूण सहा राज्यांमध्ये आत्महत्येची टक्केवारी 94.1 इतकी आहे. 
 
काही राज्यांमध्ये एकाही शेतक-याने आत्महत्या न केल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये बिहार, पश्चिम बंगाल, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, मिझोरम, नागालँड आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये 2015 मध्ये एकाही शेतक-याने आत्महत्या केलेली नाही. 
 
शेतमजूरांच्या आत्महत्येतही महाराष्ट्रातील आकडा सर्वात जास्त आहे. एकूण 1261 शेतमजूरांनी आत्महत्या केली आहे. यानंतर मध्यप्रदेश 709 आणि तामिळनाडू 604 आत्महत्यांसह दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहे. देशभरातील आत्महत्येच्या आकडेवारी दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2014 मध्ये 12,360 जणांनी आत्महत्या केली होती. जो आकडा 2015 मध्ये 12,602 वर पोहोचला आहे.