नवी दिल्ली : देशात २०२१ मध्ये १,६४,०३३ एकूण आत्महत्या झाल्या असून, त्यात २०२० च्या तुलनेत ७.२% वाढ झाली आहे. त्यातही महाराष्ट्र टॉपर आहे. देशाच्या एकूण संख्येच्या एकट्या महाराष्ट्राचा वाटा १३.५% (२२,२०७) आहे. त्यानंतर तमिळनाडू (११.५%) तर मध्ये प्रदेश (९.१%) यांचा नंबर लागतो. यात कोणाचे किती प्रमाण आणि त्यातही आत्महत्येचे प्रामुख्याने कारण काय जाणून घेऊ या...
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये कोणाचे किती प्रमाण? रोजंदार २५.६% गृहिणी १४.१% व्यावसायिक १२.३% नोकरदार ९.७% बेरोजगार ८.४% विद्यार्थी ८.०% शेतीशी निगडित ६.६% निवृत्तीधारक ०.९% इतर १४.४
आत्महत्येची कारणे कोणती? कौटुंबिक समस्या ३३.२% आजार १८.६% व्यसनाधीनता ६.४% वैवाहिक समस्या ४.८% प्रेमसंबंध ४.६ कर्जबाजारीपणा ३.९% बेरोजगारी २.२% करिअर समस्या १.६% नजीकच्या व्यक्तीचा मृत्यू १.२% गरिबी १.१% मालमत्ता प्रकरण १.१% परीक्षेत नापास होणे १%समाजात बदनाम झाल्याने ०.५% संशयास्पद नातेसंबंध ०.४% वंध्यत्व ०.२% माहीत नाही ९.७% इतर कारणे ९.२%