शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

पंचायत राज संस्थांच्या सक्षमीकरणात महाराष्ट्र आघाडीवर - राज्यपाल

By admin | Published: March 21, 2016 3:08 AM

पंचायतराज संस्था अधिक सक्षम आणि बळकट करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. आता ७३व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज संस्थांना

मुंबई : पंचायतराज संस्था अधिक सक्षम आणि बळकट करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. आता ७३व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज संस्थांना विविध अधिकार बहाल करून त्यांना अधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम करावे, असे आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले. यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्था, गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रविवारी राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दीपक केसरकर राज्यातील विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सरपंच, अधिकारी उपस्थित होते. राज्याचा अर्थसंकल्पही कृषी आणि ग्रामविकासाला चालना देणारा आहे. दुष्काळमुक्तीसाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेत सर्वांनी अधिकाधिक योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपालांनी या वेळी केले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आतापर्यंत विविध योजना आखूनही गावांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. हे चित्र बदलण्यासाठी नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे. यासाठी गावांनी पुढील पाच वर्षांचे विकास आराखडे तयार करून नियोजनबद्ध विकासाचा कार्यक्रम राबवावा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. (प्रतिनिधी)यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोल्हापूर, लातूर व अहमदनगर या जिल्हा परिषदांना अनुक्रमे पहिले तीन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच ब्रह्मपुरी (जि.चंद्रपूर), कराड (जि. सातारा) या पंचायत समित्यांना अनुक्रमे पहिले दोन, तर राहुरी (जि. अहमदनगर) व मालवण (जि. सिंधुदुर्ग) या पंचायत समित्यांना तिसरा पुरस्कार विभागून देण्यात आला. महालगाव (ता. कामठी, जि. नागपूर), लोणी बु. (ता. राहाता, जि. अहमदनगर), कसबा उत्तूर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) या ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम तीन पारितोषिके प्रदान करण्यात आली. एकूण २ कोटी ७० लाख इतक्या रकमेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.