शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Maharashtra winter session 2021 :...तुम्ही, हाॅस्पिटल बांधताय की, ताजमहाल? विधान परिषदेतील त्याच त्या उत्तराने सदस्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 06:16 IST

Maharashtra winter session 2021 : ठाणे येथील कौसा रूग्णालयाचे काम पूर्ण होत नसल्याने हॉस्पिटल बांधतात की, ताजमहाल, असा प्रश्न भाजपचे निरंजन डावखरे यांनी केला.

मुंबई : रखडलेले प्रकल्प, वाढता खर्च आणि शासनाकडून मिळणारी नेहमीची उत्तरे यामुळे मंगळवारी विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. ठाणे येथील कौसा रूग्णालयाचे काम पूर्ण होत नसल्याने हॉस्पिटल बांधतात की, ताजमहाल, असा प्रश्न भाजपचे निरंजन डावखरे यांनी केला. तर, दशकानुदशके ज्येष्ठ सदस्यांचे महत्त्वाचे प्रश्न सुटत नसतील तर, सभागृह हवेच कशाला, असा संताप किरण सरनाईक यांनी व्यक्त केला. पहिल्यांदाच आमदार बनलेल्या सरनाईकांच्या संतप्त भाषणामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापले होते.

निरंजन डावखरे यांनी कौसा रुग्णालयाची उभारणी तसेच उभारणीच्या कामाला लागलेला विलंबासंबंधी लक्षवेधी मांडली होती. यावर, कौसा रूग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. या कामासाठी ५४ कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. पावसाळा वगळून २४ महिन्यांची मुदत कंत्राटदाराला दिली होती. 

तसेच या रुग्णालयाच्या ६७.७८ कोटी रूपयांच्या टप्पा दोनच्या प्रस्तावास महापालिकेच्या महासभेने १३ एप्रिल २०१८ रोजी मंजुरी दिली आहे. आतापर्यंत या कामासाठी ५६.१३ कोटी रुपये खर्च झाल्याचे तनपुरे यांनी सांगितले. यावर संतप्त होत, हॉस्पिटल बांधताय की, ताजमहाल, असा प्रश्न डावखरे यांनी उपस्थित केला.

उपसभापतींनी दिला सबुरीचा सल्ला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कशीबशी चर्चा पूर्ण केली. नवीन आमदार सभागृहात आल्यावर त्यांना रुळायला वेळ लागतो. अनेकदा सभापती त्यांना बोलायला प्रोत्साहन देत असतात. मंगळवारी मात्र किरण सरनाईक यांना आवरण्याची वेळ आली. सभापतींनी शेवटी त्यांना दालनात बोलावून कामकाजाबाबत सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते.

सूचना करूनही सरनाईकांची सरबत्तीराष्ट्रवादी पुरस्कृत अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक मंगळवारी  प्रथमच बोलायला उभे राहिले होते. सोमवारी सभागृहात ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांनी निरोपाच्या भाषणात कोकण विकासाचे प्रश्न सोडवता आले नसल्याचे म्हटले होते. तर, आज डावखरे आणि कपिल पाटील यांनी आपापल्या लक्षवेधींचे प्रश्न सुटत नसल्याचे म्हटले. यावर, भावनावेगात सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना वारंवार शांत राहण्याची सूचना केली. मात्र, सरनाईक शांत व्हायला तयार नव्हते. वर्षानुवर्षे प्रश्न सुटत नसतील तर, प्रश्न विचारायचे कशाला, सभागृह हवेच कशाला अशी सरबत्ती सरनाईक यांनी केली. 

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरेVidhan Parishadविधान परिषद