शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
2
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
5
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
6
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
7
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
8
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
9
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
10
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
11
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
12
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
13
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
14
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
15
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
16
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
17
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
18
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
19
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
20
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

जयपूरमध्ये महाराष्ट्राचा दबदबा

By admin | Published: November 18, 2016 5:22 AM

‘पिंक सिटी’ जयपूर येथे नुकताच झालेल्या चौथ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत बलाढ्य महाराष्ट्राने आपला दबदबा राखला.

मुंबई : ‘पिंक सिटी’ जयपूर येथे नुकताच झालेल्या चौथ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत बलाढ्य महाराष्ट्राने आपला दबदबा राखला. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा सांघिक विजेतेपदावर कब्जा करताना महाराष्ट्राने या खेळातील आपले वर्चस्व स्पष्ट केले. ३ सुवर्ण आणि प्रत्येकी एक रौप्य व कांस्य अशी एकूण ५ पदकांची कमाई करुन महाराष्ट्राने सांघिक विजेतेपद उंचावले. त्याचवेळी यजमान राजस्थान संघाने उपविजेतेपद पटकावले.सवाई मानसिंग स्टेडियम येथे झालेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या मनिष राव - भूषण पोतणीस या कसलेल्या जोडीने अपेक्षित बाजी मारताना यजमान राजस्थानच्या भरत राज - प्रशांत यांचा ११-५, ११-७ असा धुव्वा उडवला. मनिष - भूषण यांच्या आक्रमक खेळापुढे यजमानांच्या जोडीचा काहीच निभाव लागला नाही.महिला दुहेरीमध्येही करिष्मा - ॠतुजा यांनी एकतर्फी बाजी मारताना महाराष्ट्राच्या पदरी आणखी एक सुवर्ण पदकाची भर टाकली. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेल्या करिष्मा - ॠतुजा यांनी राजस्थानच्या गरिमा - मधुलिका यांचा ११-२, ११-३ असा फडशा पाडला.त्याचवेळी, मिश्र दुहेरीमध्ये मात्र महाराष्ट्राच्या अतुल एडवर्ड - नताशा बेग या बलाढ्य जोडीला झुंजावे लागले. राजस्थानच्या अश्वनी - कविता यांनी तीन सेटपर्यंत झुंज देत महाराष्ट्राच्या जोडीला कडवी टक्कर दिली. मात्र, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा चांगला अनुभव असलेल्या अतुलने नताशासह मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना अश्वनी - कविता यांचे आव्हान ११-१, ५-११, ११-६ असे परतावले. (क्रीडा प्रतिनिधी)