शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

"महाविकास आघाडी सरकार अल्पमतात, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा", नारायण राणेंनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 1:37 PM

Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीतील निकाल पाहता महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले आहे, त्यामुळे Uddhav Thackeray यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी Narayan Rane यांनी केली आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाल्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मोठ्या आत्मविश्वासाने संजय पवार यांच्या रूपात दुसरा उमेदवार दिला होता. मात्र पवार यांच्या परावभवामुळे उद्धव ठाकरेंवर मोठी नामुष्की ओढवली आहे. त्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निषाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकीतील निकाल पाहता महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

नारायण राणे म्हणाले की, राज्यसभा निवडणूक होण्यापूर्वी काहीजण बढाया मारत होते. पण त्यांची नाचक्की झाली आहे. ते स्वत:चे आमदारही वाचवू शकले नाहीत. आतापर्यंतच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. फडणवीसांवर टीका करत होते. आम्ही वाघ आहोत, अमुक आहोत. जी भाषा वापरायला नको होती ती वापरली. मी त्या भाषेचा उल्लेख करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. तसेच बेअब्रू झाली. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हे दुर्दैव समजतो.

राज्यसभा निवडणुकीत तीन जागा जिंकणार, असे शिवसेना सांगत होती. शेवटी काय झालं. संजय राऊत एका मताने निवडून आले. थोडक्यात वाचले आमच्या हातातून.  एकूणच सत्तेत असलेल्या आघाडीची मतं यांना मिळाली पाहिजे होती. पण तेवढी ती मिळाली नाही. उद्धव ठाकरेजी सत्ता राखण्यासाठी १४५ जणांचा पाठिंबा लागतो. तुम्ही अल्पमतात आलेले आहात. तुम्ही राजीनामा द्या.नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या आणि बाजूला व्हा. या महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेलंत. तसेच सत्ताधारी आणि विरोधक यांचं नातंही तुम्ही धुळीला मिळवलंत. म्हणून तुम्हाला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

तुमचे ८-९ आमदार फुटतात. तुमच्याबाबत विश्वासार्हता राहिलेली नाही. आम्ही विरोधात असूनही आमदारांना एकत्र ठेवलं. मात्र तु्म्हाला ते जमलं नाही. शरद पवारांनी निकालानंतर जी प्रतिक्रिया दिली. त्यातून बोध घ्या. चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे, पण तुमच्याकडून तशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा