शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 17:32 IST

हरयाणातील निवडणूक निकालाने काही दिवसांतच निवडणुकीला सामोरे जात असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखीही वाढवली आहे. 

Haryana Election Result ( Marathi News ) : हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्व एक्झिट पोल्स आणि राजकीय विश्लेषकांचे अंदाज मोडीत काढत बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. मागील १० वर्षांपासून सत्तेत असल्यामुळे निर्माण झालेला असंतोष, शेतकऱ्यांची नाराजी, महिला पैलवानांचे आंदोलन या पार्श्वभूमीवर भाजपला हरयाणाची निवडणूक जिंकणं कठीण जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज प्रत्यक्ष निकालात भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत ९० जागांच्या हरयाणा विधानसभेत आताच्या स्थितीत ४९ जागांवर आघाडी घेतली आहे. हरयाणातील या निकालामुळे तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांची निराशा झालीच आहे, मात्र त्यासोबतच काही दिवसांतच निवडणुकीला सामोरे जात असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखीही वाढवली आहे. 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विरोधकांच्या महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत ४८ पैकी तब्बल ३१ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर आता हरयाणा विधानसभेतही जवळपास सर्वच एक्झिट पोल्सने काँग्रेसला यश मिळेल, असा अंदाज वर्तवल्याने महाराष्ट्रातील काँग्रेससह मविआतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता. मात्र आज हरयाणा विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि हळहळू काँग्रेसच्या जागांचा आकडा कमी झाला. या निकालाचे परिणाम हरयाणासह महाराष्ट्राच्या राजकारणावरही होण्याची शक्यता आहे.

हरयाणातील कोणते चार मुद्दे महाराष्ट्रात मविआसाठी ठरू शकतात डोकेदुखी?

१. विपरीत स्थितीतही भाजपने यश मिळवलं

हरयाणा विधानसभा निवडणुकीची परीक्षा भाजपसाठी खडतर ठरणारी होती. कारण मागील १० वर्षांपासून राज्यात सत्तेत असल्यामुळे समाजातील विविध स्तरांतील लोकांमध्ये सरकारप्रती असंतोष निर्माण झाला होता. हीच बाब हेरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सहा महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री बदलत नायब सिंह सैनी यांच्यावर मुख्यमंत्रि‍पदाची जबाबदारी सोपवली. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरयाणातील १० पैकी पाच जागा मिळवत काँग्रेसने भाजपला चांगली झुंज दिली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस वरचढ ठरणार, असं चित्र  निर्माण झालं होतं. परंतु या विपरीत स्थितीतही अचूक निवडणूक नियोजन करत भाजपने यशाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्रातही सध्या भाजपप्रणित महायुतीसाठी फारसं अनुकूल वातावरण नाही. लोकसभा निवडणूक निकालातून याची प्रचिती आली होती. मात्र भाजपने मागील काही वर्षांत खडतर स्थितीतही काही अनोखे डावपेच आखत सत्ता मिळवण्याचं तंत्र विकसित केलं असल्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लढाई महाविकास आघाडीसाठी सोपी असणार नाही, हे हरयाणा निवडणूक निकालातून स्पष्ट झालं आहे.

२. शेतकरी आणि इतर घटकांच्या असंतोषाचा फायदा काँग्रेसला उचलता आला नाही!

हरयाणात मागील काही वर्षांपासून समाजातील विविध घटकांनी सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. यामध्ये शेतकऱ्यांसह महिला खेळाडूंवरील अन्याय आणि इतर काही बाबींचा समावेश होता. महाराष्ट्रातही कांदा, सोयाबीन अशा पिकांचे भाव आणि दुधाच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये खदखद आहे. तसंच दुसरीकडे मराठा, ओबीसी, धनगर आणि आदिवासी समाजात आरक्षण प्रश्नावरून अस्वस्थता आहे. मात्र समाजातील अस्वस्थतेला आवाज देण्यात हरयाणात काँग्रेस अपयशी ठरली असल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश येणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

३. अतिआत्मविश्वास नडला!

हरयाणात आम्ही कोणत्याही स्थितीत बहुमताचा जादुई आकडा गाठू, असा ठाम विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. काही नेत्यांनी तर आम्हाला ९० पैकी ७० हून अधिक जागा मिळतील, असा दावा केला होता. मात्र काँग्रेस नेत्यांचा हा अतिआत्मविश्वास पक्षासाठी घातक ठरला. महाराष्ट्रातही मविआतील तीनही पक्षांकडून वेगवेगळे आकडे सांगत बहुमत मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र लोकसभा निवडणूक निकालाच्या आधारे केले जाणारे हे दावे विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षात उतरवायचे असतील तर जागावाटपाचं गणित नीटपणे सोडवून नंतर योग्य उमेदवार दिले, तरंच सत्ताधारी महायुतीचा सामना करणं महाविकास आघाडीला शक्य होणार आहे.

४. मुख्यमंत्रि‍पदावरून मतभेद!

हरयाणात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला अनुकूल वातावरण दिसत असल्याने पक्षात मुख्यमंत्रि‍पदासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. या स्पर्धेतूनच काही नेत्यांकडून स्वपक्षातील नेत्यांवरच जाहीरपणे टीकेचे बाणही चालवले जात होते. महाराष्ट्रातही मविआत मुख्यमंत्रि‍पदावरून होणारा संघर्ष लपून राहिलेला नाही. मविआतील तीनही प्रमुख पक्षांकडून मुख्यमंत्रि‍पदावर दावा ठोकला जात असून ही अंतर्गत स्पर्धा महाराष्ट्रातही मविआचा घात करू शकते.

दरम्यान, हरयाणा विधानसभेचा निकाल काँग्रेस आणि मविआसाठी निराजाशानजक ठरला असला तरी महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनी हुरळून जाण्यासारखी स्थितीही राज्यात दिसत नाही. कारण शेतकऱ्यांसह आरक्षण प्रश्नावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यात सत्ताधाऱ्यांना अद्याप यश आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर होत असलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रंगतदार ठरणार, हे मात्र निश्चित. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुती