शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

राज्यातील प्रमुख ५६ धरणांनी गाठला तळ; गतवर्षीपेक्षा ७ टक्के कमी पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 9:49 AM

राज्यात नागपूर विभागातील १६ मुख्य धरणांपैकी केवळ दोन धरणांची पातळी खालावली आहे. उ

- बाळासाहेब बोचरेमुंबई : यंदा पाऊस कमी पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असतानाच, बिपोरजॉय वादळामुळे मान्सूनही लांबला असून, अजून उन्हाच्या झळा सुरूच आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा लक्षणीय घटला असून, गतवर्षाच्या तुलनेत तो सात टक्क्यांनी कमी आहे. 

राज्यात नागपूर विभागातील १६ मुख्य धरणांपैकी केवळ दोन धरणांची पातळी खालावली आहे. उर्वरित १२३ प्रमुख धरणांपैकी ५४ धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. विशेषत: पुणे आणि कोकण विभागातील धरणांनी तळ गाठला आहे. राज्यातील प्रमुख १३९ धरणांतील साठा गतवर्षी सरासरी ३०.७२ टक्के होता, तो आजच्या घडीला सरासरी २३.७४ टक्के झाला आहे.  

या पार्श्वभूमीवर राज्यातील मध्यम प्रकल्पाचे मात्र आशादायी चित्र असून, एकूण २६० प्रकल्पांमध्ये सरासरी ३०.७२ टक्के साठा असून, तो गतवर्षीच्या तुलनेत सरासरी चार टक्के अधिक आहे. राज्यातील  लघुप्रकल्पामध्येही आशादायी चित्र आहे. एकूण २,५९० लघुप्रकल्पामध्ये सरासरी १६.९७ टक्के साठा असून, तो गतवर्षी  १३.४३ टक्के होता. 

पाण्यासाठी दाही दिशाराज्यात पाणीटंचाईच्या अतिशय तीव्र झळा महाराष्ट्रातील जनतेला भोगाव्या लागत आहेत. राज्यात २,७५४ गावे व वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागत असून ५२३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

१३९ धरणांमधील पाणीसाठा

विभाग    धरणे    पाणीसाठा    गतवर्षीअमरावती    १०    ३९.८३%    ४०.८०%औरंगाबाद    ४४    ३३.५९%    ३६.८९%कोकण    ११    २७.५९%    ३५.५९%नागपूर    १६    ४०.९२%    ३०.६७%नाशिक    २३    २७.६५%    २७.०७%पुणे    ३५    १०.४२%    १३.३१%एकूण    १३९    २३.७४%    ३०.७२%

टॅग्स :Damधरण