मुंबई : लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये चिंतनीय वाढ झाली आहे. पत्रकारांवर हल्ला म्हणजेच लोकशाहीवर हल्ला़ हे हल्ले रोखले पाहिजेत. येत्या दिवाळीच्या आधी पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा महाराष्ट्र शासनाने मंजूर करावा, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. मीरा-भार्इंदर येथील पत्रकार राघवेंद्र दुबे यांची नुकतीच हत्या करण्यात आली. आठवले यांनी दुबे कुटुंबीयांची भेट घेऊन रिपाइंतर्फे दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली.
‘पत्रकार संरक्षण कायदा करा’
By admin | Published: July 20, 2015 1:41 AM