शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

गावागावांत विमानतळाच्या बाजूने ठराव करा

By admin | Published: October 19, 2016 1:36 AM

‘‘पुरंदर तालुक्यात दर वर्षीच पाऊस कमी पडतो. पडला तर पिकाला बाजारभाव मिळत नाही

भुलेश्वर : ‘‘पुरंदर तालुक्यात दर वर्षीच पाऊस कमी पडतो. पडला तर पिकाला बाजारभाव मिळत नाही. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. सुरुवातीला पुरंदर तालुक्यात विमानतळ व्हावे, यासाठी सर्वच तयार होते. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले व मतांचे राजकारण करत येथील दलाल विमानतळाच्या विरोधात उभे राहिले. पुरंदरचा विकास साधायचा असेल, तर गावागावांत विमानतळ होण्याच्या दृष्टीने ठराव करण्यात यावे,’’ असे आवाहन जलसंधारण व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील मावडी व पिंपरी येथे जलपूजन व अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी आयोजित कार्यक्रमात शिवतारे बोलत होते.शिवतारे म्हणाले, की दलालांनी शेतकऱ्यांच्या जमिनी विकून त्यांना भकास केले आहे. केवळ मते मिळवण्यासाठी त्यांची डोकी फिरली आहे. विमानतळासंदर्भात चांगली भूमिका घ्या. विमानतळ झाल्यास शेतकऱ्यांना चांगले पॅकेज मिळणार आहे. जमिनीचा परतावा मिळणार असल्याने, त्या ठिकाणी कंपन्या उभारून त्यातही शेतकऱ्यांची भागीदारी राहणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या पाच हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार आहे. एम.आय.डी.सी मध्ये मोठ्याकंपन्या येतील. त्यातही तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. यामुळे पुरंदर तालुका विकासाच्या दिशेने जाणार आहे. हे विमानतळ झाल्यास शेतकऱ्यांची शंभर पिढ्यांची प्रगती होणार असल्याचेही शिवतारे यांनी सांगितले. या वेळी पुरंदर तालुका शिवसेनेचे प्रमुख दिलीप यादव, अप्पासााहेब कोलते, गणेश मुळीक, माणिक निंबाळकर, धीरज जगताप, दिलीप देवकर, प्रल्हाद थेऊरकर, पांडुरंग देवकर, हरीश शेंडकर, संदीप गायकवाड, शहाजी गायकवाड, किरण साळुंखे, परिसरातील असंख्य ग्रामस्त महिला उपस्थित होत्या. या वेळी प्रल्हाद शेंडकर, रूपाली हंबीर, कलावती गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. (वार्ताहर)