शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

अखेर माळीणला मिळाले साडेपाच कोटी!

By admin | Published: January 09, 2015 2:22 AM

दोन खात्यांच्या वादात दुर्घटनाग्रस्त माळीण गावाचे पुनर्वसन अडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच राज्य सरकार खडबडून जागे झाले.

मुंबई : दोन खात्यांच्या वादात दुर्घटनाग्रस्त माळीण गावाचे पुनर्वसन अडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच राज्य सरकार खडबडून जागे झाले. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून त्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तत्काळ ५ कोटी ५५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी जारी केली. तसेच माळीण गावाचे पुनर्वसन आता मदत व पुनर्वसन विभागामार्फत निर्णयदेखील घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५.५५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे आजच सुपूर्द करण्यात आले. या रकमेसह आतापर्यंत मृतांच्या वारसांना ७ कोटी ५५ लाख रुपये देण्यात आले आहे. या दुर्घटनेत १५१ जण मृत्युमुखी पडले होते. मृत व्यक्तीच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचे शासनाने जाहीर केले होते. १ आॅगस्ट २०१४ रोजी २ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यानंतर मदत देण्यात आलेली नव्हती. उर्वरित अर्थसहाय्य आज देण्यात आले. पुनर्वसनाचे काम आदिवासी विकास विभागाऐवजी आता मदत व पुनर्वसन विभागातर्फे करण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)आदिवासी विकास आणि मदत व पुनर्वसन या दोन विभागांच्या वादात माळीणचे पुनर्वसन रखडले, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन मदतीचा प्रश्न मार्गी लावला.