शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

माझ्या टप्प्यात आला तर वाजवणारच...; मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 5:50 PM

जातीजातीत दंगली भडकवण्याच्या भाषा तुम्ही केली. परंतु मराठे राज्यात जातीय दंगली होऊ देणार नाही असा विडाच आम्ही खांद्यावर उचलला आहे असं जरांगे म्हणाले.

नाशिक - २०२३ चा मराठ्यांचा लढा उभा राहिला आणि कुणबी नोंदीचे पुरावे सापडले. मराठा समाजाचे लेकरं हुशार असूनही आरक्षण नसल्याने उच्च पदावर जाण्याऐवजी छोट्या छोट्या पदावर काम करावं लागले. ज्यांची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करायची वेळ मराठा मुलांवर आली.माझ्या टप्प्यात आला तर वाजवणारच. जनतेचे पैसे तुम्ही खाल्ले, महाराष्ट्र सदनासह सर्व लुटले म्हणून तुम्ही जेलमध्ये गेला. लोकांचा तळतळाट लागला. ज्यांची लायकी नाही त्यांचे नाव मी घेत नाही. अगोदर त्यांच्या विचाराला आमचा विरोध होता. व्यक्ती म्हणून नको. माझा प्रामाणिकपणा समाजाला सिद्ध करून दिला आहे. मी खरेच बोलतो. वैचारिक विचार, मतभेद असायला हवे. आता व्यक्ती म्हणूनही त्यांना आपला विरोध आहे. जो माणूस घटनेच्या, कायद्याच्या पदावर बसलाय तो माणूस कायदा पायदळी तुडवायला लागला. जातीजातीत दंगली, मराठा-ओबीसीत वाद होतील अशी विधाने करू लागला. कायदा सांभाळण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही दंगली होतील अशी विधाने करतायेत हा कसला तुमचा वैचारिक वारसा? अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. 

मनोज जरांगे पाटील हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यावेळी जरांगेंनी भुजबळांवर जोरदार प्रहार केले. जरांगे पाटील म्हणाले की, तुमच्या पोटातील गटारगंगा तुम्ही बाहेर काढली आणि स्वत:ची लायकी दाखवली. जातीजातीत दंगली भडकवण्याच्या भाषा तुम्ही केली. परंतु मराठे राज्यात जातीय दंगली होऊ देणार नाही असा विडाच आम्ही खांद्यावर उचलला आहे. मी संयम ठेवलाय, मी कुणाचं ऐकून घेत नाही. राजकीय स्वार्थासाठी मराठा-ओबीसीत दंगल घडवायची हा ह्यांचा हेतू. पण यांचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही हे मी ठरवले. त्यामुळे मी काहीच उत्तर देत नाही. गावखेड्यातील ओबीसी बांधवांची भावना आहे की, मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर त्यांना आरक्षण द्यायला हवे अशी त्यांना वाटते. आजही गावखेड्यात मराठा-ओबीसी बांधव एकमेकांच्या मदतीला धावून जातायेत असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मराठा समाजाला आरक्षण होतं, तरीही मराठ्यांना जाणुनबुजून दिले नाही. नुसतं बोंबलत बसायचं ही खानदानी मराठ्यांची संस्कृती नाही. किती दिवस मतभेद ठेवणार? मला अनेक फोन येतात, तुमच्या गाडीत हा नको, तो नको, त्याच्यापासून लांब जा, अरे बसू द्या. मी जास्त वळवळ करून देत नाही. माझी भूमिका समाजाला आरक्षण मिळवून द्यायची आहे. जातीसाठी एकी हवी. गोरगरिबांच्या लेकरांना आयुष्याची भाकरी द्यायची त्यासाठी ही लढाई आहे. आता काय व्हायचे ते होऊ द्या, सुट्टीच नाय...माझ्या ताफ्यात जेवढ्या गाड्या आहेत त्यांच्यात स्वत: डिझेल टाकायचे, मराठ्यांनी कुणाकडे पैसे मागायचे नाहीत. जर कुणी पैसे घेत असेल तर मला सांगा, त्याचा कार्यक्रमच करतो. इथे जातीसाठी न्याय मागतोय. अंतरवालीत शांततेत आंदोलन सुरू होते. काय झालं माहिती नाही. पण २५ व्यादिवशी आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला, आयाबहिणींची डोके फोडण्यात आले. पोरांच्या छातीत गोळ्या घातल्या असा आरोप जरांगे पाटलांनी केला. 

दरम्यान, ४-५ दिवसांनी मला फोन यायला लागले, दादा आता रक्त सांडलंय, पण आता मागे हटायचे नाही. आरक्षण मिळवायचे. ते आंदोलन आजही शांततेत सुरू आहे. आमच्यावर का हल्ला केला याचे उत्तर आजही सरकारला देता आले नाही. ज्यांच्यावर हल्ला झाला, मारपण आम्ही खाल्ला, आमच्यावर ३०७, १२० ब सारखी कलमे लावली. जालनात कट नेमका कुणी रचला? लाठीचार्जचे आदेश कुणी दिले त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता.ओबीसीत एखादी जात घ्यायची असेल तर ती मागास असायला हवी. १९६७ ला व्यवसायावर आधारित जाती निर्माण केले आणि आरक्षण दिले. व्यवसायावर आधारित आरक्षण दिले मग मराठ्यांना का नाही? मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? मराठ्यांची पोरं मोठी होऊ द्यायची नाही हे षडयंत्र होते, मराठ्यांनी विश्वास ठेवला आणि गाफील राहिले असंही जरांगे पाटील बोलले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळOBCअन्य मागासवर्गीय जाती