शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

मनोज जरांगेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, “...तर सगळे मराठे अयोध्येला जाणार”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 2:31 PM

Manoj Jarange Patil News: राम मंदिराचे काम अर्धवट झाले आहे, तरी तुम्ही तीच तारीख का निवडली, अशी शंका आम्ही कधी उपस्थित केली नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil News ( Marathi News ): आम्ही कट्टर हिंदू आहोत. अमूकच तारीख का निवडली, याचा आणि राम मंदिर लोकार्पणाचा काही संबंध नाही. मुंबईत मुद्दामहून १८ तारखेपर्यंत जमावबंदी लागू केली. त्यामुळे आम्ही २० तारीख निवडली. अयोध्येत राम मंदिर होत आहे, याचा आम्हालाही तितकाच आनंद आहे. आम्ही मुंबईत आनंद व्यक्त करू, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचे लोकार्पण केले जाणार आहे. मात्र, नेमकी हीच वेळ मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्यासाठी निवडली, असा आरोप केला जात आहे. यावर मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. 

मीडियाशी बोलताना, छत्रपती शिवरायांच्या काळात जास्त महत्व ध्येय आणि विचारांना दिले जात होते. त्याचप्रमाणे आमचे ध्येय आणि सूत्र ठरले आहे. गोरगरीब मराठ्यांच्या ध्येयांसाठी आम्ही काम करतो आहे, असे सांगत मनोज जरांगे यांनी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, देव मनात असायला हवा. सगळे तिथे पोहोचू शकत नाही. सामान्य शेतकरी शेतातून राम-राम म्हणतो. एकमेकांना भेटल्यावर राम-राम म्हणतो. राम मंदिराचे काम अर्धवट झाले आहे, तरी तुम्ही तीच तारीख का निवडली, अशी शंका आम्ही कधी उपस्थित केली नाही. श्रीरामावर तुमच्यापेक्षा आमची जास्त आस्था आहे. २० तारखेला सगळा मराठा पायी चालण्यास सुरुवात करेल, तेव्हा २२ तारखेला सगळेच जण राम मंदिराच्या लोकार्पणाचा आनंद व्यक्त करणार आहेत. आम्हीही त्या आनंदात सहभागी आहोत. गेल्या चार महिन्यांपासून आमचे आंदोलन सुरू आहे. विविध टप्प्यांवर आंदोलन सुरू आहे. सरकारशी चर्चा सुरू आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

सरकार मुद्दामहून असे पसरवतेय, असा समज होईल

प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन मराठे मुंबईकडे निघणार आहेत. आम्ही इकडे आनंद व्यक्त करतो. हे सगळ्यांना मान्य आहे. असे काही जोडू नका. अन्यथा सरकार मुद्दामहून असे पसरवतेय, असा समज समाजात होईल आणि सरकारविषयी नाराजी वाढेल, असे नमूद करत, सरकारने कोणाचीही वाहने अडवू नयेत.आंतरवालीचे प्रयोग करण्याचा पुन्हा प्रयत्न करू नये. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. मुंबईकडे मराठे शांतपणे येणार आहेत आणि शांतपणे परत जाणार आहेत. एखादे वाहन जरी अडवले तरी तिघांच्या दारात जाऊन लाखो मराठे बसतील. मुंबईसह नागपूर, बारामती या ठिकाणी जाऊन तिघांच्या दारात बसू. घराला वेढा दिला जाईल, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

मनोज जरांगे पाटील अयोध्येत जाऊन श्रीरामांचे दर्शन घेणार का?

अयोध्येत जाण्याबाबत मनोज जरांगे यांना प्रयत्न विचारण्यात आला. यावर सकारात्मक उत्तर देत, श्रीरामांनी सरकारला सुबुद्धी द्यावी. श्रीरामांच्या चरणी आमची विनंती आहे, साकडे आहे की, केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत सर्वांना सद्बुद्धी द्यावी. २० तारखेच्या आत आम्हाला आरक्षण द्या. मग मराठे मोकळे झाले, तिकडे यायला. मग काही अडचण नाही. मनोज जरांगेसह सगळे मराठे अयोध्येत दर्शनासाठी जातील. पण काही झाले तरी आरक्षण सोडणार नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

दरम्यान, आम्ही ठरवले आहे आता महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार. आमचा जीव गेला तरीही मुंबईचे आंदोलन होणारच. लाठीचार्जमध्ये हात-पाय मोडले गेले. मी ते काहीही विसरलो नाही. आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जची आठवण आली की आजही माझ्या अंगावर काटा येतो. त्या किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरले होते. मोठा आवाज, रक्ताने माखलेली जागा, धूर, लाठीचार्ज, माता माऊलींच्या किंकाळ्या, अमानुष लाठीचार्ज ही घटना आठवली की सरकारचे तोंडही पाहू नये असे वाटते. पण आता गाव त्याच ताकदीने पेटून उठले आहे. जे रक्त सांडले त्याचे बळ निर्माण झाले आहे. तो विषय काढण्यासारखा नाही. ज्या मातामाऊलींचे रक्त सांडले आहे ते वाया जाऊ देणार नाही. या समाजासाठी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर