शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 14:36 IST

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: मराठा समाजाच्या एकजुटीचा हा विजय आहे. कोण भेटी द्यायला येते आणि नाही, याकडे समाजाचे लक्ष आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: मराठा आरक्षणासंदर्भातील ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा,  आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले. महिनाभरात मागण्या मान्य न झाल्यास उपोषण न करता विधानसभा निवडणुकीत उतरून तुमचे उमेदवार पाडू, असा इशाराही जरांगे  यांनी दिला. यातच पुन्हा एकदा पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी सूचक शब्दांत इशारा दिला आहे. 

उपोषण स्थगित केल्यानंतर रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या खासदार निलेश लंके यांनी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तत्पूर्वी, १३ तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. आता कोण कोण इथे येते आहे आणि कोण नाही, याकडे आमचे लक्ष लागले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

१३ तारखेपर्यंत वाट बघणार आहोत

आम्ही सरकारला वेळ दिला असून १३ तारखेपर्यंत वाट बघणार आहोत. ज्यांनी यापूर्वी कधी भेट दिली नव्हती, ते सगळे सध्या येत आहेत. आजी-माजी खासदार, आमदार हे पाठिंब्याचे पत्र घेऊन येत आहेत. त्यामुळे समाजाचे लक्ष आहे कोण येत आहे आणि कोण येत नाही. मराठा समाजाच्या एकजुटीचा हा विजय आहे. सर्वांकडूनच अपेक्षा ठेवणे आंदोलकाचे काम असते. माझा मराठ्यांच्या एकजुटीवर आणि चळवळीवर विश्वास आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने लेखी द्यावे, या मागणीवर ठाम असलेल्या लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची प्रकृती  खालावली आहे. हाके यांचे बीपी वाढले असून उपोषणाचा चौथा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांनी फोन करून ओबीसी आरक्षणाला धक्का  लागणार नाही, असे सांगितले असले तरी तो कसा लागणार नाही, याबाबत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगणे आवश्यक आहे. कायद्याला धरून नसलेल्या कुणबी नोंदी सरकार देत असेल तर ओबीसींचे मूळ आरक्षण कसे टिकेल हेही त्यांनी महाराष्ट्राला सांगावे, असे आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण