शहरं
Join us  
Trending Stories
1
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
3
'शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्र्रवादीचे मिक्स विचार', इकडे हिंदूत्वाचा विचार';गुलाबराव पाटलांचा पलटवार
4
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
5
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल
6
अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी
7
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
8
दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
9
हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
10
HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी
11
ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्... (Video)
12
महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा
13
IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी
14
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
15
Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया
16
पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण
17
नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत
18
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
19
जामनगरचा नवीन 'राजा' अजय जडेजा; राजघराण्याचा पुढचा वारस ठरला, जाणून घ्या इतिहास
20
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ

"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 2:38 PM

Manoj Jarange Patil: आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची. मात्र सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर, सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला उलटपालटं केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

आज बीड जिल्ह्यातील नारायणगड येते झालेल्या दसरा मेळाव्यामधून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्यातील महायुती सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे. मागच्या १४ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. पण सरकारने एकही मागणी मान्य केलेली नाही. आता सरकारला सुट्टी नाही. सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. आता आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची. मात्र सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर, सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला उलटपालटं केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करेन. तेव्हा मी जे सांगेन ते तुम्ही ऐकायचं, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित मराठा समाजाला केले.

यावेळी उपस्थित मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, या ताकदीनं आपण एकत्र येणार असं वाटलं नव्हतं. दु:खातून सुखाकडे जायचं आहे. या समुदायावर संस्कार आहेत, त्यामुळे हा समुदाय कधीच जातीयवाद करू शकत नाही. संपूर्ण राज्यभर पसरलाय. पण कधी मस्तीत आणि मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचं प्रत्येकाला साथ देण्याचं काम या समुदायानं केलंय. यांनी कधी जातीयवाद केला नाही आणि जात यांना कधी शिवली पण नाही.  एवढा जनसमुदाय पहिल्यांदाच बघतोय. काय बोलावं ते सूचत नाही आहे.  एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय आलाय की की, तुमच्या चरणावर खरंच नतमस्तक व्हायला पाहिजे. जातीवाद न करण्याची शिकवण या नारायणगडाने राज्याला देशाला दिलीय. या गडाच्या आशीर्वाद ज्याच्या पाठीवर पडतो तो दिल्लीसुद्धा वाकवतो, असे जरांगे पाटील म्हणाले. 

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आरक्षणाच्या मागणीसाठी मागच्या १४ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारने एकही मागणी मान्य केली नाही. माझं सरकारला एकचं सांगणं आहे. सरकार, ओय सरकार, आता तुम्हाला सुट्टी नाही. आचारसंहिता लागण्याआधी जनतेचे सर्व प्रश्न सोडवायचे. मात्र तसं झालं नाही तर आचारसंहिता लागल्यानंतर मी सांगेन ते तुम्ही ऐकायचं. हे काय करताहेत हे सगळं बघायचं. त्यांच सगळं करून झाल्याशिवाय आपण निर्णय घ्यायचा नाही. नंतर सगळं गणित उलटं करून टाकायचं. 

एक गोष्ट लक्षात असू द्या, शेवटी आपल्यापुढे पर्याय नाहीये. मी माझी मुख्य भूमिका आचारसंहिता लागल्यानंतर सांगणार आहे. तुम्हा सगळ्यांना मान्य आहे ना. यांनी आपल्याला फसवलंय. त्यामुळे आता आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची.  जनतेच्या मागण्यांची अंमलबजावणी आचारसंहिता लागेपर्यंत करतात का हे पाहायचं. मात्र असं झालं नाही तर यांच्या नाकावर टिच्चून यांना उलथं केल्याशिवाय मागे हटणार, असा इशाराच जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. तसेच ‘’तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला संपवल्याशिवाय मागे हटणार नाही’’, असं आश्वासनही त्यांनी मराठा समाजाला दिलं. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार