शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

तुम्ही जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुके हाती घ्यावे लागतील -मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 16:39 IST

बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला. 

Manoj Jarange Santosh Deshmukh News: "संतोष देशमुख यांच्या आरोपींना तातडीने अटक करा. ज्यांनी आरोपींना पळवून लावलं. त्या नेते, मंत्र्यांनाही अटक करा. तुम्ही जातीयवाद मंत्र्यांना पोसणार असाल, तर आम्हाला दंडुके हातात घ्यावे लागतील", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला दिला. 

बीडमध्ये बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, प्रत्येक वेळी आंदोलन करण्याची गरज नाही. विरोधी आणि सत्ताधारी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी आणि ज्यांची ज्यांची नावे घेतली गेली आहेत, त्यांना अटक करा असे सांगावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

त्या लेकराचा सोन्यासारखा बाप गेला - मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील म्हणाले, "विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं. ज्याची नावे घेतली त्या सगळ्यांना अटक करा म्हणून सांगा. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला धक्का सुद्धा लागू देणार नाही. संतोष भाऊंच्या लेकीकडे बघा. त्या लेकराला घरात बाप दिसत नाही. तिला दुःख आलं तर तिच्या पाठीवरून कोणी हात फिरवायचा? तिच्या तोंडावरून हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला. तुमची आमची भाषणे होत राहतील, पण तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभं राहावं लागेल", असे आवाहन जरांगेंनी केली.  

मनोज जरांगे म्हणाले, "आता जशास तसे उत्तर द्यायचे"

"राज्यभर हे लोण आंदोलनाचे पसरले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा. कुणी मागे सरकायचं नाही. आणखी एक सल्ला धाडसी बना. हे आणखी हल्ले करू शकतात. आता वाट बघायची नाही. कोणीही आपल्यावर हल्ला केला की, जशास तसे उत्तर द्यायचे", असे मनोज जरांगे म्हणाले. 

"तुमचा नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्षातील नेते आमचे सासरे नाहीत. आमच्या आईच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले. पुढच्या काळात सावध रहा. सरकार आलंय. सरकार गोरगरिबांना न्याय देणार की नाही. संतोष देशमुखांची हत्या झाली. परभणीचे प्रकरण झाले", असे जरांगे यांनी यावेळी सांगितले. 

आम्हालाही दंडुके घ्यावे लागतील -मनोज जरांगे

"तुम्ही जातीयवादी मंत्री जर पोसणार असलात, तर आम्हाला दंडुके हातात घ्यावे लागतील. मराठ्यांना संपवायला निघालेत. जातीयवादी मंत्री तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे चिलटं तुम्हाला धरता येत नाहीत. मग अवघड आहे. आम्ही खवळलो, तर आम्हाला नाव ठेवू नका", असा इशारा मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला दिला. 

"या राज्यात सरकार पक्षाला किंवा काही जातीयवादी मंत्र्यांना विध्वंस घडवून आणायचा असला, तरी आम्हाला घडवू द्यायचा नाही, हे प्रामाणिकपणे सांगतो. तुम्ही सगळ्यांनी (सर्व पक्षीय आमदार) मुख्यमंत्र्यांकडे जावं. त्या आरोपींना पकडण्यासंदर्भात बोलावं आणि कुटुंबीयांना घरी येऊन सांगावं की, आम्ही दोन-तीन दिवसांत सगळ्यांना पकडणार आहोत. ज्या नेत्याने, आमदाराने त्यांना पळवून लावलं आहे, त्याचेही कुटुंब आत टाका म्हणजे तो पळून गेलेला घरी येईल. एखाद्या मंत्र्याला अटक करण्यासाठी राज्यपालांची परवानगी लागते. राज्यपाल तुमचाच आहे", असे म्हणत मनोज जरांगेंनी मंत्र्यालाही अटक करण्याची मागणी केली. 

टॅग्स :BeedबीडManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDhananjay Mundeधनंजय मुंडे