शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Mansukh Hiren Death Case: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी 'या' ५ मुद्द्यांचे अद्यापही कोडे; ATS चे धक्कादायक खुलासे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 16:23 IST

Mansukh Hiren Death Case: या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला असून, ATS ने आपल्या प्राथमिक अहवालात हिरेन यांच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देमनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला नाट्यमय वळणएटीएससमोर गूढ वाढवणाऱ्या बाबी उघडएटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासे

मुंबई : जागतिक पातळीवर सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आघाडीवर असलेले उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. या स्फोटकांसह धमकीचे पत्रही होते. या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) झाल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला असून, ATS ने आपल्या प्राथमिक अहवालात हिरेन यांच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत काही धक्कादायक खुलासे केल्याचे सांगितले जात आहे. (mansukh hiren death case maharashtra ats theory and 5 shocking points)

ATS गोळा केलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन दोन मोबाईल वापरत होते. मृत्यूपूर्वी दोन्ही मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणांहून स्वीच ऑन आणि स्वीट ऑफ करण्यात आले. एका मोबाईचे लोकेशन वसईतील मांडवी तर दुसऱ्याचे लोकेशन तुंगारेश्वर असून, दोन्ही मोबाईल स्वीच ऑफ आणि स्वीच ऑन होण्याआधी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय एटीएसकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास NIA कडे; एटीएसने केले स्पष्ट

पुरावे नष्ट करण्यास मिळाला वेळ

दुसरे म्हणजे आत्महत्या करणारी व्यक्ती कोरोनाच्या भीतीने तोंडावर मास्क किंवा रुमाल लावते, हे न पटणारे आहे. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाली असावी, हा संशय बळावतो आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तोंडावाटे पाणी शरीरात जाऊन काही वेळातच मृतदेह पाण्यावर तरंगला असता, यासाठी मनसुख हिरेन यांच्या तोंडात रुमालाचे बोळे होते. यामुळे मारेकऱ्यांना पसार होण्यास आणि पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळाला, असे सांगितले जात आहे. 

तपास यंत्रणा भरकटवण्यासाठी केलेला भाग

हिरेन यांचा मृत्यू त्यांचा मृतदेह पाण्यात फेकण्याच्या १२ ते १६ तास आधी झाला असावा, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल ऑन ऑफ करण्याचे तंत्र हा तपास यंत्रणा भरकटवण्यासाठी केलेला भाग असावा, असा संशय एटीएसच्या अधिकाऱ्यांना आहे, असे म्हटले जाते आहे. 

दरम्यान, हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र एटीएसने गुन्हा नोंद केला आहे. मात्र, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांसंदर्भातील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडेच राहणार आहे, असे एटीएसकडून स्पष्ट करण्यात आले. 

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणAnti Terrorist SquadएटीएसMukesh Ambaniमुकेश अंबानीPoliceपोलिस