शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

मुंबईत ९ आॅगस्टला मराठा महामोर्चा

By admin | Published: May 25, 2017 2:31 AM

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, परीक्षा अशा अनेक कारणांनी लांबणीवर पडलेल्या मुंबईतील मराठा क्रांती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, परीक्षा अशा अनेक कारणांनी लांबणीवर पडलेल्या मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाची तारीख अखेर ठरली आहे. येत्या ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनाचे निमित्त साधत मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने बुधवारी सम्राट हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.समन्वयक रवींद्र काळे-पाटील म्हणाले की, ९ आॅगस्ट रोजीच राज्यातील मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली होती. त्यामुळे राजधानीत महामोर्चा काढण्यासाठी हाच दिवस निवडण्यात आला आहे. सर्व आचारसंहितांचे पालन करून निघणाऱ्या या मोर्चात देशातील मराठा समाजाला आणण्याचे नियोजन केले जाईल. या नियोजन अभियानाची घोषणा ६ जूनला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे निमित्त साधत केली जाईल. व्यापक अभियानातून खेड्यापाड्यामधील मराठा तरुणापर्यंत पोहोचले जाईल. १३ जुलैला कोपर्डी येथील क्रांतिज्योतीला श्रद्धांजली वाहून अभियानाचा आढावा घेतला जाईल. एक वर्ष पूर्ण होत असतानाही कोपर्डीतील पीडितेला न्याय मिळाला नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.राणीबाग मैदान ते आझाद मैदानपर्यंत धडक देणारा हा महामोर्चा खऱ्या अर्थाने देशव्यापी महामोर्चा ठरेल, असा दावाही समन्वयकांनी केला आहे. आतापर्यंत सरकारसोबत चर्चेसाठी एक चेहरा नसल्याने मराठा समाजाच्या प्रश्नांची सरकारने गंभीरतेने दखल घेतली नाही, असा आरोप समन्वयक राजेंद्र कोंडरे यांनी केला. ते म्हणाले की, मराठा विद्यार्थ्यांना शुल्कमाफी व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रमुख मागणी येत्या आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आवाहन सरकारला केले आहे. सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर २० महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी एक समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये शिक्षण, शेती आणि इतर क्षेत्रांतील जाणकारांसह मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे..................................इतर समाजांनी विरोध करू नये!मराठा समाजाला कोणत्याही जातीचे आरक्षण नको आहे. शिवाय अ‍ॅट्रोसिटी कायदा रद्द करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी नाही. तर अ‍ॅट्रोसिटी कायदा कडक करताना त्याचा गैरवापर होणार नाही, अशी तरतूद करण्याचा संघटनेचा आग्रह आहे. त्यामुळे कोणत्याही समाजाने मराठा क्रांती मोर्चा विरोधात मोर्चा काढण्याची गरज नसल्याचे मत नाना कुटे-पाटील यांनी व्यक्त केले.शेतकरी संपाला पाठिंबा१ जूनपासून संपावर जाणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना मराठा क्रांती मोर्चाने पाठिंबा घोषित केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रामाणिक आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चा पाठिंबा देईल, असेही समन्वय समितीने स्पष्ट केले.