शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

मुंबईत मराठा मूक मोर्चा : निर्णय १५ जानेवारीला

By admin | Published: January 10, 2017 5:03 AM

मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर २० मागण्यांसाठी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चावरून समन्वयकांमध्येच समन्वय नसल्याचे समोर आले आहे.

 मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर २० मागण्यांसाठी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चावरून समन्वयकांमध्येच समन्वय नसल्याचे समोर आले आहे. काही जिल्ह्यांतील समन्वयकांनी ३१ जानेवारी या तारखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे; तर काही प्रतिनिधींकडून कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढणार असल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे. त्यामुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.याआधी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या औरंगाबाद येथील समन्वयकांनी ३१ जानेवारीला मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा केली. पण बैठकीत नियोजनाऐवजी ३१ जानेवारीच्या तारखेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. मुंबईसह रायगड, नवी मुंबई, पालघर आणि ठाण्यातील काही समन्वयकांनी या तारखेसंदर्भात चर्चा करण्याची मागणी केली. शिवाय १५ जानेवारीला बैठक घेऊन त्यातच अंतिम निर्णय घेण्याचे मान्य केले. औरंगाबादचे समन्वयक रवींद्र काळे पाटील यांनी ३१ जानेवारीला कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला. त्यापाठोपाठ मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही मोर्चा निघणारच असा एल्गार केला आहे. (प्रतिनिधी)बैठकीतील निर्णय मान्य!३१ जानेवारीला मोर्चा काढण्यास विरोध नाही. मात्र मुंबईसह राज्यातील २६ जिल्ह्यांत असलेल्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा सारासार विचार व्हायला हवा. त्यामुळे १५ जानेवारीला होणाऱ्या राज्यातील सर्व जिल्हा प्रतिनिधींच्या बैठकीतील निर्णय मान्य केला जाईल. तोपर्यंत समाजाने कोणत्याही घोषणेवर विश्वास ठेवू नये.- वीरेंद्र पवार (समन्वयक, मराठा क्रांती मूक बाइक रॅली - मुंबई)सुपारी घेतल्यासारखे वागू नये!मुंबईतील महामोर्चा हे मराठा समाजाचे ब्रह्मास्त्र आहे. आचारसंहितेमध्ये सरकारचे हात बांधलेले असताना कुणाच्या तरी अट्टाहासासाठी ते वाया घालविण्यात काहीही अर्थ नाही. मुळात निवडणुकांच्या काळात राजकीय उमेदवारांना मोर्चात सामील होता येणार नाही.त्यामुळे केवळ सुपारी घेतल्यासारखे कोणत्याही समन्वयकाने वागू नये. - विनोद पोखरकर (समन्वयक, मराठा क्रांती मूक मोर्चा - नवी मुंबई)अपयशी झाल्यास काय करणार?आचारसंहितांमूळे निवडणुकांच्या कामात मराठा समाजाचे उमेदवार अडकून मोर्चा अपयशी झाल्यास काय करणार? याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे सर्व जिल्हा प्रतिनिधींनी मिळून १५ जानेवारीच्या बैठकीत योग्य तो निर्णय घ्यावा.- विनोद साबळे (समन्वयक, मराठा क्रांती मूक मोर्चा - रायगड)समन्वयात नाही, तर तारखेवरून गोंधळ!मोर्चा निघू नये, म्हणून सरकारचा कोणताही दबाव नाही. केवळ ३१ जानेवारीलाच मोर्चा काढायचा की पुढे ढकलायचा याबाबत गोंधळ आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत तो स्पष्ट होईल.- वैभव जाधव (समन्वयक, मराठा क्रांती मूक मोर्चा - पालघर)