शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

आणखी किती दिवस चर्चा करायची, अन्याय सहन करणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 10:46 AM

तुम्ही शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही हे किती दिवस चालणार? असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला.

बीड - Manoj Jarange Patil on Maratha Reservation ( Marathi News ) चर्चेतून मार्ग निघतो,पण आम्ही थांबणार नाही. तुम्ही चर्चेत गुंतवून आम्हाला पुढे पुढे ढकलत राहणार हे चालणार नाही. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण हवं आहे. सरकारसोबत आजही चर्चा सुरू आहे. वेळ देणार नाही. तुमचे शब्द होते, तुम्ही पूर्ण केला नाही. आम्ही कधीही चर्चेला आलेल्या परत पाठवले नाही.तुमचा सन्मानच केला. तुम्ही ३० दिवस मागितले आम्ही ४० दिवस दिले. चर्चेत गुंतवून ठेवायचे आणि विषय भरकटवायचा हे होणार नाही अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेपूर्वी दिला आहे. 

बीडमध्ये जरांगे पाटलांची निर्णयाक सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिली होती.परंतु आजही यावर ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आज बीडच्या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी पत्रकारांशी जरांगेंनी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला किती दिवस तुम्ही झुलवत ठेवणार? आमच्या संयमाचा अंत पाहिला जातोय. तुम्ही शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही हे किती दिवस चालणार? सुरुवातीला ३ महिने, त्यानंतर ४० दिवस दिले तरी पुढे काय झाले? अजूनही आज आणि उद्याचा दिवस आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही कायद्याच्या चौकटीतच आरक्षण मागतोय, आम्ही मागास सिद्ध झालोय, ५४ लाख नोंदी सापडलेत. मग हे कायद्यात बसलेत ना..किती दिवस समाजाला येड्यात काढणार आहात? मराठ्यांनी किती दिवस अन्याय सहन करायचा हे आम्ही चालू देणार नाही. आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणारच. इच्छाशक्ती असली की एका दिवसात आरक्षण मिळेल. एकाचे ऐकून तुम्ही मराठ्यांवर अन्याय करताय. पुढील काळात मराठे कसे आरक्षण घेतात हे तुम्ही पाहा. मराठ्यांनी ज्याला मोठे केले, त्याच्या डोक्यात किडे भरले आहेत. विष ओकायला लागलेत. ही किती गटारगंगा होती हे मराठ्यांना लक्षात आले. कुजकं बोलतो का? माझ्या नादी लागू नको. शहाणा हो असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिले आहे. 

दरम्यान, सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे, वारंवार चर्चा केली जातेय. तेच तेच सुरू आहे. सरकारने माझ्याशी संपर्क केला, बोलणं सुरू आहे. पण किती दिवस चर्चा करणार? संयमांचा अंत किती बघणार? प्रत्येकवेळी मराठ्यांनी शब्द पाळायचा. आम्हालाही काही मर्यादा आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोलणे नाही, गिरीश महाजनांचा फोन आला होता. कायद्याच्या चौकट सरकारच्या दृष्टीने वेगळी आहे का? लोक हुशार झालेत. आम्हाला आरक्षण हवं आणि आम्ही ते घेणारच. मराठ्यांची गरज नाही अशा भावनेतून सरकार चाललंय असा आरोप जरांगे पाटील यांनी सरकावर केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती