शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातच सरकारला दणका बसेल; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 12:03 PM

जनतेने तुम्हाला मोठे केले. तुमचे कोणी काहीही करू शकत नाही अशी भाषा करता, तुम्ही कोण लागून गेले असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. 

जालना - Manoj Jarange Patil on Maratha Reservation ( Marathi News ) सरकारनं सगेसोयरेबाबत जी अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी व्हायला हवी होती. विशेष अधिवेशन घेऊन सरकारनं काय केले? तुम्ही स्वत:ला मोठे समजत असाल पण जनता समजत नाही. मोटारसायकल दिली पण पेट्रोल दिलं नाही अशी अवस्था आहे. जर तुम्ही सगेसोयरेबाबतची अंमलबजावणी करून मराठा आरक्षण दिले असते तर १५ दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला निसता. आणखी १-२ दिवस तुमच्याकडे आहेत जर एकदा आंदोलनाची तारीख ठरली की विषय संपलाच. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातच सरकारला दणका बसेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

अंतरवाली सराटी येथे आंदोलनास बसलेल्या जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, २०१८ मध्ये अशाप्रकारेच मराठा आरक्षण निवडणूक जवळ आल्यावर दिले होते. त्याचा फायदा त्यांना झाला होता. पण आता समाजाच्या लक्षात आलंय. त्यावेळी दिलेले आरक्षण रद्द झाले. आता तेच आरक्षण पुन्हा दिले, आता हा प्रयोग लोकांच्या लक्षात आला आहे. पहिल्यांदा समाज फसला, आरक्षण मिळाले म्हणून मते दिली होती. त्यामुळे समाजाला सगेसोयरेसह दोन्ही आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली. 

तसेच मराठा आरक्षणासारखा ज्वलंत मुद्दा राज्यात असताना सरकार निवडणूकच घेणार नाही. सगेसोयरेबाबत अंमलबजावणी केल्यानंतर निवडणूक होऊ शकते. सगेसोयरेबाबत मराठा आमदारांनी विधिमंडळात भाष्य केले का? तुम्हाला बोलू दिले नाही असं म्हणत असाल तर निदान तुम्ही पत्र दिलंय का ते दाखवा. मराठ्यांना येड्यात काढू नका. ज्यावेळी बोलायला संधी मिळाली तेव्हा किती आमदार बोलले त्यांची नावे लक्षात आहेत. नागपूर अधिवेशनात कोण बोलले आणि कोण नाही हे समाजाला माहिती आहे. मराठा आमदारांनी डोक्यातील हवा कमी केली पाहिजे. जनतेने तुम्हाला मोठे केले. तुमचे कोणी काहीही करू शकत नाही अशी भाषा करता, तुम्ही कोण लागून गेले असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. 

दरम्यान, सरकारकडे आणखी १-२ दिवस आहे. एकदा आंदोलनाची तारीख ठरली तर विषय संपला. आमच्यापुढे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. मराठ्यांचा आधी प्रश्न मार्गी लावा मग निवडणूक घ्या. एकदा आंदोलन सुरू झाले तर थांबत नाही. सहा महिन्यापासून सलग आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला कितीही दिवस लागले तरी मागे हटणार नाही. मराठ्यांना विजयाचा टिळा लागल्याशिवाय मागे हटत नाहीत असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण