शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
5
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
6
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
9
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
10
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
11
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
12
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
13
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
14
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
15
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
16
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
17
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
18
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
19
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
20
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण

जरांगेंचा इशारा, सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी कधी?; चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 9:52 AM

चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Chandrakant Patil ( Marathi News ) : आरक्षण प्रश्नावरून महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून मोठा गदारोळ सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारल्यानंतर ओबीसी नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत या मागणीला कडाडून विरोध केला आहे. या दोन्ही घटकांच्या आंदोलनामुळे राज्य सरकार कोंडीत सापडल्याची स्थिती आहे. अशातच भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, "सरकारने जी सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढलेली आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: ड्राफ्ट केलेली आहे. सरकारने ती त्यांच्यावर थोपवलेली नाही. या अधिसूचनेवर ८ लाखांच्या आसपास सूचना आणि हरकती आलेल्या आहेत. या हरकती तपासल्यानंतर आम्ही अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करणारच आहोत. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजाने घाबरण्याचं काहीच कारण नाही, हे आम्ही ओबीसी समाजाला समजावून सांगत आहोत. ही अधिसूचना निघाल्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का बसत नाही. एखाद्याचं कुणबी प्रमाणपत्र सापडल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनाही हे प्रमाणपत्र मिळावं, अशी ती अधिसूचना आहे," अशा शब्दांत पाटील यांनी सरकारची भूमिका मांडली. 

दरम्यान, २०१७ सालीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना याबाबत एक निर्णय घेतला होता. रक्तसंबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही, असा कायदा केला होता, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मनोज जरांगेंचा इशारा 

मनोज जरांगे पाटील यांनी सध्या मराठा शांतता रॅलीला सुरुवात केली आहे. "सरकारने आता मराठा समाजाचा संयम पाहू नये. १३ जुलैपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्यावे व सगेसोयरे कायदा अमलात आणावा, अन्यथा त्यानंतरची भेट थेट मुंबईत होईल," असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी हिंगोलीत संवाद रॅलीदरम्यान दिला. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत संवाद रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला ६ जुलैला हिंगोलीतून प्रारंभ झाला. यावेळी मराठा समाजबांधवांशी संवाद साधताना जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर कडाडून टीका केली. भुजबळांचे ऐकून मराठ्यांचे नुकसान करू नका, नाही तर या सरकारला जड जाईल. मराठ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर २८८ पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणchandrakant patilचंद्रकांत पाटील