शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

मनोज जरांगे पाटलांच्या सभेचं नियोजन कोण करतं?; खुद्द जरांगेंनीच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 2:05 PM

सारासार विचार करून आमचे आंदोलन पुढे चाललंय. २०११ पासून जेवढे जेवढे आंदोलन आम्ही केले ते एकही अपयशी झाले नाही असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला

सातारा - गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा रान पेटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे आरक्षणाच्या मुद्द्याला बळ मिळालं. त्यानंतर आता जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाते. जिल्ह्याजिल्ह्यात सभा आयोजित केल्या जातात. त्यात हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतात. जरांगे पाटलांच्या या दौऱ्याचं नियोजन आणि सभा कोण आयोजित करते याबाबत खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी खुलासा केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही राज्याच्या दौऱ्याच्या तारखा नियोजित करतो. त्यानंतर सगळ्यांना सांगितले जाते. तारीख दिली की समाज तयारी करतो. यात विशेष समिती अथवा टीम नाही. खूप जणांचे मत होते समिती, टीम बनवली पाहिजे. परंतु आम्ही मागचा आढावा घेतला तेव्हा समिती, टीम बनवली त्यानंतर अनेकदा फूट पडली, समितीमुळे एक माणूस बाजूला गेला तर फूट पडल्याचे दिसते. त्यामुळे आमचा समाजच आमची टीम आहे. समाजावर सोपवल्यामुळे आरक्षणाचा विषय मार्गी लागतोय, ७० टक्के लढाई यशस्वी झालीय, ३० टक्के बाकी आहे. समाजावर जबाबदारी सोपवली आहे. समाजच मालक असल्याने प्रत्येकजण स्वत:हून पुढे यायला लागले. कुठलेही राजकारण येत नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच मराठा समाजाच्या लेकरांनी आत्महत्या केली, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर असताना दिवाळी साजरी करायची नाही असं ठरवलं. आमच्यात टीम असती तर संवादात दुरावा आला असता. सामाजिक काम करताना मालकत्व स्वीकारून चालणार नाही. प्रत्येकाला हे आंदोलन यशस्वी व्हावं असं वाटतंय. मी समोरच्या माणसाच्या जीवनातील दैनंदिन अडचणी वाचतो. मी आंदोलनात दगाफटका कसा झाला, कोणत्या कारणाने झालो, यशस्वी होणारे आंदोलन अचानक मागे कसे पडले, समज-गैरसमज कसे पसरवले जातात यावर मी जास्त अभ्यास केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने हे आंदोलन सुरू आहे. सारासार विचार करून आमचे आंदोलन पुढे चाललंय. २०११ पासून जेवढे जेवढे आंदोलन आम्ही केले ते एकही अपयशी झाले नाही असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, प्रसिद्धीमुळे आता प्रोटोकॉलनुसार वागलं पाहिजे असं काहीजण सांगतात, पण मी ऐकत नाही. माझ्या गाडीला कोणी हात दाखवला तरी मी थांबतो, प्रसिद्धीमुळे डोक्यात हवा जाऊ देत नाही. आपण जमिनीवर आहोत, जमिनीवरच राहिले पाहिजे. हवेत जायचं नाही. पहिल्यापासून मी जसा आहे तसाच राहतोय. डोक्यात मस्ती जाऊ देत नाही. मी आहे त्या लोकांमुळे आहे. त्यामुळे लोकांमध्येच राहणार. माझ्या भेटण्यामुळे एका व्यक्तीलाही आनंद होत असेल तर तो आनंद हिरावून घेतला नाही पाहिजे. आपल्यामुळे जर त्याला आनंद मिळत असेल तर का भेटायचे नाही. आपल्याला गर्व चढू द्यायचा नाही. ज्यांच्यामुळे आपण आहोत, त्यांना भेटलो नाही तर आपल्या जगण्याला शून्य किंमत आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण