शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

रिक्षा परवान्यासाठी मराठीची सक्ती रद्द

By admin | Published: March 02, 2017 6:02 AM

रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषेची सक्ती करण्याचा राज्य सरकारचा आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत रद्द केला

मुंबई : मोटार वाहन कायदा व नियमांत कोणताही बदल न करता केवळ एका परिपत्रकाद्वारे रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषेची सक्ती करण्याचा राज्य सरकारचा आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत रद्द केला. न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठी न जाणणाऱ्या रिक्षाचालकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. परवान्यासाठी मराठी भाषा समजणे बंधनकारक करायचे असल्यास सरकारला आधी कायद्यात व नियमांत सुधारणा करावी लागेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उपरोक्त प्रकरणात राज्य सरकारने कायदेशीर कार्यवाही न करता केवळ परिपत्रकाद्वारे ही सक्ती केली आहे. राज्य सरकारने योग्य मार्गाने स्थानिक भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करावे, त्यासाठी त्यांना कोणीही अडविले नाही, असे न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. आतापर्यंत मराठी सक्तीच्या अटीमुळे अपात्र ठरलेले चालक आता परवान्यासाठी अर्ज करू शकतील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. परिवहन विभागाने परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालयांना निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. त्यास मीरा-भार्इंदर रिक्षाचालक संघटना व उपनगरातील अन्य संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यासंबंधीच्या याचिकांवर उच्च न्यायालयाने हा निकाल दिला.प्रवासी हे वाहनात बसल्यानंतर चालकाने त्यांच्याबरोबर गैरवर्तवणूक केली तर काय करायचे? तत्काळ उपाययोजना काय आहेत? केवळ कॉल सेंटर सुरू करून काहीच फायदा होणार नाही. आतापर्यंत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत, मात्र पुढे त्यांचे काहीच झाले नाही. त्यामुळे दोन महिन्यांत तक्रार निवारण केंद्र स्थापन करा, असा आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिला. तक्रार निवारण केंद्राने तक्रारींवर केलेल्या कारवाईची तपशीलवार माहिती सादर करावी. ती परिवहन विभागाने संकेतस्थळावरही टाकावी, असे स्पष्ट करत न्यायालयाने मे महिन्यात यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. उच्च न्यायालयाने प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित करत केवळ कॉल सेंटर पुरेसे नसून तक्रार निवारण केंद्राचीही आवश्यकता असल्याचे नमूद केले. मराठी भाषा सक्तीप्रमाणेच अन्य नियमांचेही काटेकोर पालन करा, असा टोलाही खंडपीठाने राज्य सरकारला लगावला. (प्रतिनिधी)>आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. आमचीही भूमिका हीच होती. दिवाकर रावते यांनी सूडबुद्धीने हा निर्णय घेतला होता. मराठीचे ज्ञान आवश्यक असणे वेगळे पण त्यासाठी परिवहन विभागाने ज्याप्रकारे सक्ती केली होती, ती चुकीचीच होती. - शशांक राव, अध्यक्ष, मुंबई आॅटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन>प्रवाशांच्या सुरक्षेवर चिंता उच्च न्यायालयाने प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित करत केवळ कॉल सेंटर पुरेसे नसून तक्रार निवारण केंद्राचीही आवश्यकता असल्याचे नमूद केले. मराठी भाषा सक्तीप्रमाणेच अन्य नियमांचेही काटेकोर पालन करा, असा टोलाही खंडपीठाने राज्य सरकारला लगावला.>रिक्षा संघटनेला समज रिक्षा संघटनांनीही नियमांमध्ये नमूद केल्याप्रमाणेच वागणे अपेक्षित आहे. दोषी रिक्षाचालकांवर काय कारवाई करणार? असे विचारत संघटनांनाही प्रतिज्ञापत्र सादर करण्यास न्यायालयाने सांगितले.>कायदेशीर बदल करणारमराठी भाषेचे प्राथमिक ज्ञान हे परवान्यासाठी अनिवार्य राहील. मराठी राज्याची राजभाषा आणि बोलीभाषा आहे. मोटार वाहन कायद्यात परवाना देताना अशी स्थानिक भाषा अनिवार्य आहे. तरीही उच्च न्यायालयाने सरकारी आदेशात ज्या त्रुटी दाखवल्या आहेत, त्यात आवश्यक कायदेशीर बदल करून मराठीची सक्ती कायम राहील, अशा धोरणाची अंमलबजावणी करू.- दिवाकर रावते, परिवहन मंत्री