शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

मराठी संवर्धन पंधरवडा मुंबई-पुण्यापुरताच का? राज्यातील साहित्य संघटनेने घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 9:17 AM

केवळ पुण्या-मुंबईतील साहित्यिक व साहित्य संस्थांचा समावेश मराठी संवर्धन पंधरवड्यात केला असल्याने याबाबत मराठी भाषा विभागासह मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, तसेच विश्वकोश मंडळ सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनाही पत्र लिहिण्यात आले आहे.

मुंबई : राज्यात १४ जानेवारीपासून मराठी भाषा विभागाने मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने ‘साहित्य सेतू’  उपक्रम जाहीर केला आहे. हा उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्री व तिथलेच मान्यवर केंद्री का, असा प्रश्न राज्यातील इतर विभागांना पडत असतो हे लक्षात ठेवणे शासनाचेच काम आहे, अशी तीव्र भावना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद जोशी यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. 

केवळ पुण्या-मुंबईतील साहित्यिक व साहित्य संस्थांचा समावेश मराठी संवर्धन पंधरवड्यात केला असल्याने याबाबत मराठी भाषा विभागासह मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, तसेच विश्वकोश मंडळ सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनाही पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात, आम्ही महाराष्ट्राचेच भाग आहोत, याचे शासनाला वारंवार स्मरण का करून द्यावे लागते, अशी विचारणा शासनाला केली आहे. शासनाला अशा उपक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या सर्व विभागांतील प्रतिभेला सामावून घेणारा सहभाग द्यावा असे धोरण असावे असे का वाटत नाही, असा सवालही जोशी यांनी पत्रात उपस्थित केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. श्रीपाद जोशी यांनी सांगितले की, शासनाच्या अशा कार्य पद्धतीमुळेच विविध विभागांत विलगतेची भावना प्रबळ होण्यास खतपाणी मिळते आणि महाराष्ट्र संयुक्तच राखू इच्छिणाऱ्यांचे बळ क्षीण केले जात आहे. त्यायोगे भाषिक, सांस्कृतिक ऐक्यालादेखील बाधा पोहोचते, हेदेखील पत्रातून शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

टॅग्स :marathiमराठी