शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

मराठी जगभरात पोहोचविणार

By admin | Published: February 28, 2016 2:08 AM

संचारक्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध साधने आपल्याला लाभली आहेत. याचा उपयोग करून मराठी जगभरात पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मत मुख्यमंत्री

मुंबई : संचारक्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध साधने आपल्याला लाभली आहेत. याचा उपयोग करून मराठी जगभरात पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.ज्येष्ठ साहित्यिक व कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर सभागृहात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना स्व. शाहीर साबळे आणि ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांना स्व. कविवर्य मंगेश पाडगावकर जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ५१ हजार रु. रोख, शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहेमुख्यमंत्री म्हणाले की, मराठीच्या संवर्धनासाठी सर्वोपरी पुढाकार घेतला जाईल. राज्य सरकार युनिकोड कन्सॉर्टियम या संघटनेचे सदस्यत्व प्राप्त करून मराठीला संगणकाद्वारे जगभर पोहोचविणार आहे. ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.आज २१व्या शतकाने जी मूल्ये तयार करून दिली, त्यामुळे संचारक्रांती झाली आहे. या संचारक्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध दालने खुली झाली आहेत. या दालनांचा वापर करून जोपर्यंत मराठी तरुणांच्या मनामध्ये शिरकाव करत नाही तोपर्यंत मराठीच्या विस्ताराची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, आपण ज्या ज्ञानाधारित समाजाचा विचार करतो या समाज रचनेत चपखल बसणारी मराठी करायची असेल तर मराठी ही ज्ञानभाषा करावी लागेल. त्यासाठी संचारक्रांतीच्या युगात मराठीचा संचार मराठी मनात करावा लागेल. या कार्यक्रमास मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, कार्यक्रमाचे आयोजक आमदार आशिष शेलार, पराग अळवणी, मनीषा चौधरी, उपमहापौर अलका केळकर, देवदत्त साबळे, अंजली पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)सहकार्य करूमराठीला साहित्याची, संस्कृतीची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी अनेक दिग्गजांनी मोलाचे कार्य केले; आणि त्यांचे कार्य अविरत सुरू राहावे यासाठी राज्य सरकार त्यांना सर्वोपरी सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या वेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे म्हणाले की, मराठीच्या संवर्धनासाठी भविष्यात काय करावे यासाठी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.