शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मराठवाडा नव्हे टँकरवाडा....!

By admin | Published: April 26, 2016 7:20 PM

गेल्या काही वर्षापासून ऋतुमानाचे चक्र उलटे फिरत असल्याने हे सगळे काही घडत आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता पाहता त्याला टँकरवाडा!....म्हणनेच योग्य वाटेल

नामदेव कुंभारमुंबई, दि. २६ - राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जनता दुष्काळाने होरपळत आहे. लातूरमध्ये मोठय़ा प्रमाणात त्याच्या झळा बसत असल्याने सरकारने मालगाडीतून या जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्याचे काम युद्धातळीवर सुरु आहे. दुष्काळ कोणालाही आवडत नाही. पण गेल्या काही वर्षापासून ऋतुमानाचे चक्र उलटे फिरत असल्याने हे सगळे काही घडत आहे. लातूरसह मराठवाड्यातील लोक आज भीषण दुष्काळला सामोरं जात आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता पाहता त्याला टँकरवाडा!....म्हणनेच योग्य वाटेल. मराठवाडा विभागातील सुमारे २४०० गावे आणि ८४५ वाड्यांना ३२०० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचे चित्र लोकमतचे छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्या छायाचित्रामार्फत आपणास दुष्काळाचे चित्र दिसेल.

या वर्षी दुष्काळाची तीव्रता कमालीची आहे. राज्यात १७, मराठवाड्यात फक्त तीन टक्के पाणी साठा शिल्लक आहे. मनाला चटका लावून जाणाऱ्या अनेक घटनांच्या मध्यभागी मराठवाडा (नव्हे टँकरवाडा!) उभा आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पारा ४० अंश सेल्शिअसच्या पुढे सरकत असल्यामुळे पाण्याचे साठे आटू लागले आहेत

गावात पाणी नसल्याने शेती तसेच सर्वच प्रकारची कामे ठप्प झाली आहेत. कर्ज घेवून पिकवलेली शेती पाण्याअभावी वाळून गेली. पिण्याच्या पाण्यासाठी ५ ते १० किमीची पायपीट करावी लागत आहे.

राज्यभरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून सर्वात जास्त नुकसान शेतीचे झाले आहे. मराठवाडा, विदर्भात दुष्काळ असून हाताला काहीही काम मिळत नसल्याने अनेकांनी शहरांची वाट धरली आहे.

मराठवाडा विभागातील सुमारे २४०० गावे आणि ८४५ वाड्यांना ३२०० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ५०२ गावे व १७ वाड्यांसाठी ७१० टँकरद्वारे, जालन्यात ४०० गावे आणि ६३ वाड्यांसाठी ४५० टँकर, परभणीत १४९ गावे, ३७ वाड्यांसाठी २०० टँकर.

हिंगोलीत २७ गावांमध्ये ३० टँकर, नांदेडमध्ये १८८ गावे, १३८ वाड्यांसाठी ३१० टँकर, बीडमध्ये ६२१ गावे आणि ५३४ वाड्यांसाठी ८०० टँकर, लातूरमध्ये १९३ गावे, ४३ वाड्यांसाठी २६० टँकर, तर उस्मानाबादमध्ये २३८ गावे आणि १३ वाड्यांसाठी ३४० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे.

सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडल्याने यंदा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात सध्या फक्त ३ टक्के पाणी आहे. पाणीकपात असल्यामुळे कुटुंबातील काही महिलांना नाल्यातून वाहणाऱया पाण्यात कपडे धुवावे लागत आहेत.

दुष्काळ कोणालाही आवडत नाही. तो कोरडा असो वा ओला. या दोन्ही दुष्काळात शेतकरी पुरता नाडला जातो. हातातोंडाशी आलेले पीक हातातून गेल्यानंतर त्याच्या नशिबी येते ती हताशा. ती व्यक्त करण्याचे मार्ग मिळाले नाहीत.

आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. राज्यात गेल्या काही वर्षापासून हवामानावर आधारित शेतीची पार वाट लागलेली आहे