शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

मराठवाडा अजूनही दुष्काळीच!

By admin | Published: September 29, 2014 5:37 AM

महाराष्ट्राच्या काही भागांतून पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून माघारी फिरणार असून मराठवाडा मात्र अजूनही दुष्काळीच राहिला आहे

पुणे : महाराष्ट्राच्या काही भागांतून पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून माघारी फिरणार असून मराठवाडा मात्र अजूनही दुष्काळीच राहिला आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या २५ ते ५० टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. पावसाळी हंगामात सुरुवातीपासून शेवटपर्यंत मराठवाड्यात तुरळक पाऊस झाल्याने संपूर्ण वर्ष टंचाईच्या स्थितीचा सामना करावा लागणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरीएवढा पाऊस झाला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस झाला. विदर्भात सरासरीच्या केवळ १२ टक्के पाऊस कमी झाला. तर मराठवाड्यात सरासरीच्या ३९ टक्के कमी पाऊस झाला. राज्यात सर्वांत कमी म्हणजे सरासरीच्या ५० टक्के कमी पाऊस परभणी जिल्ह्यात झाला. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ४९, हिंगोली जिल्ह्यात ४८, लातूर जिल्ह्यात ४०, जालना जिल्ह्यात ३५, बीड जिल्ह्यात ३४, वाशिम जिल्ह्यात ३० आणि चंद्रपूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची प्रत्येकी २५ टक्के तूट आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या १५ टक्के अधिक पाऊस झाला. त्यापाठोपाठ धुळे जिल्ह्यात सरासरीच्या ११, मुंबई उपनगरात सरासरीच्या १० टक्के अधिक पाऊस पडला आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक तर १५ जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढा पाऊस झाला. (प्रतिनिधी)