शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

मार्च २०१८ अखेर महाराष्ट्र हागणदारीमुक्त!

By admin | Published: February 07, 2017 4:41 AM

महाराष्ट्र मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त (ओपन डेफिकेशन फ्री-ओडीएफ) होईल, असा शब्द महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केंद्र सरकारला दिला आहे

नवी दिल्ली : महाराष्ट्र मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त (ओपन डेफिकेशन फ्री-ओडीएफ) होईल, असा शब्द महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केंद्र सरकारला दिला आहे. सोमवारी मुंबईत पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत क्षत्रिय यांनी माहिती दिली. राज्यभरातील हागणदारीमुक्तीबाबत खातरजमा करण्यासाठी राज्य सरकारकडे तिसऱ्या पक्षाकडून पुर्नतपासणी सुरू केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.महाराष्ट्राने स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी हात धुणे, मासिक पाळीतील स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृहे आदी ध्येयही आम्हाला गाठायची आहेत. त्यासाठी स्वच्छ कार्यालये, स्वच्छ शाळा आदी मोहिमाही राबवल्या जात आहेत, असे क्षत्रिय म्हणाले. स्वच्छ भारत मिशनच्या मंत्रालयाने राबविलेल्या उपक्रमांत जिल्हा पातळीवर टाटा ट्रस्टच्या सहकार्याने प्रेरक उपलब्ध करून दिला जाईल. स्वच्छ भारत मिशनमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी सहभाग घ्यावा, यासाठी क्षत्रिय यांनी एक विशेष सादरीकरण केले. सार्वजनिक क्षेत्रांतील उपक्रमांनी त्यांच्या कामगारांना व व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना स्वच्छता दूत म्हणून प्रशिक्षित करावे, अशी सूचना डिपार्टमेंट आॅफ पब्लिक एंटरप्रायजेसच्या सचिवांनी या वेळी केली.