शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मंत्रालयात ३१ मार्चची घाई, निधी खर्च करण्यासाठी धावपळ अन्यथा अखर्चित निधी पुन्हा तिजोरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 06:54 IST

वित्त विभागासाठी उरलेले दोन दिवस हे अत्यंत घाईगडबडीचे असणार आहेत

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपत असून आता केवळ तीन दिवस निधी खर्च करण्यासाठी आणि प्रलंबित देयके (बिले) अदा करण्यासाठी हातात आहेत. त्यातही हे तीनही दिवस सुट्टीचे आहेत. मात्र वर्षअखेर लक्षात घेता मंत्रालयातील अनेक विभागांनी गुढीपाडव्याचा ३० मार्चचा दिवस वगळता शनिवार २९ मार्च आणि रमजानची सुटी असलेला सोमवार ३१ मार्च हे दोन दिवस काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यातही वित्त विभागासाठी उरलेले दोन दिवस हे अत्यंत घाईगडबडीचे असणार आहेत. 

विविध विभागांनी आतापर्यंत ६१.९० टक्के निधी खर्च केला आहे. यात सर्वाधिक खर्च मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविणाऱ्या महिला व बालविकास विभागाने केला आहे. उरलेल्या दोन दिवसांत जास्तीत जास्त निधी खर्च करणे, जास्तीत जास्त देयके अदा करण्यावर विविध विभागांचा भर असेल. यासाठी रात्री उशिरापर्यंत मंत्रालयातील कार्यालये सुरू राहतील. मंत्रालयात दरवर्षीच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये देयके वा निधीकरिता गर्दी होत असते. शेवटच्या दिवशी वित्त विभागात अधिकारी देयके आणि निधीसाठी येत असल्याने वित्त विभागात उभे राहायला जागा नसते.

...अन्यथा निधी तिजोरीत

विविध विभागांचे अधिकारी तसेच विविध विभागांत देयके प्रलंबित असलेले कंत्राटदारही मंत्रालयात गर्दी करतात. असेच चित्र  मंत्रालयात आहे. अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी आर्थिक तरतूद केली जाते. हा निधी आर्थिक वर्षात खर्च करावा लागतो अन्यथा तो अखर्चित निधी म्हणून तिजोरीत वर्ग केला जातो. हे टाळण्यासाठी मार्च महिन्यात  निधीचे वाटप केले जाते. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMantralayaमंत्रालय