शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

नाशिकच्या बाजारसमितीत व्यापारी-शेतकरी आमने-सामने

By admin | Published: June 03, 2017 2:13 PM

काही व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांनी त्यांना कडाडून विरोध करत सुरूवातीला विनंती केली;मात्र व्यापाऱ्यांनी दाद न दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक

नाशिक : सकाळी अकरा वाजता नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी काही व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांनी त्यांना कडाडून विरोध करत सुरूवातीला विनंती केली;मात्र व्यापाऱ्यांनी दाद न दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. संपाची दिशा ठरविली जात असताना व नाशिकच्या शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे संप मागे घेतला नसताना बाजारसमितीत व्यवहार सुरू करू नये, असे शेतकरी यावेळी सांगत होते. दरम्यान, पोलीसांनी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांची धरपकड सुरू केली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यामुळे बैठकीलाही विलंब झाला. पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांनी सुरू केली. यावेळी तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना पोलीसांनी नंतर सोडून दिले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून शेतमालाची विक्री हाणून पाडली. मिरच्या, डांगर, गाजर, रस्त्यावर फेकून निषेध नोंदविला. पोलिसांनी यावेळी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थीती नियंत्रणात आली आणि बैठकीला सुरूवात झाली.