शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

मार्मागोवाचे जलावतरण

By admin | Published: September 18, 2016 5:09 AM

देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी बांधण्यात आलेल्या ‘मार्मागोवा’ (मुरगाव) या युद्धनौकेचे माझगाव गोदी येथे शनिवारी जलावतरण करण्यात आले.

मुंबई : देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी बांधण्यात आलेल्या ‘मार्मागोवा’ (मुरगाव) या युद्धनौकेचे माझगाव गोदी येथे शनिवारी जलावतरण करण्यात आले. माझगाव गोदीत बांधणी झालेल्या या युद्धनौकेने नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांच्या प्रमुख उपस्थितीत समुद्रात प्रवेश केला.सागरी सीमांच्या रक्षणासाठी मार्मागोवा महत्त्वाची भूमिका बजावणार असून, या युद्धनौकेवर सहा ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत. ही नौका ५६ किलोमीटर प्रतितास वेगाने ७५ हजार किमीपर्यंत सागरी सीमांचे संरक्षण करणार आहे. युद्धनौकेवर तैनात असलेली सर्व क्षेपणास्त्रे ही स्वदेशी बनावटीची असणार आहेत. त्याचबरोबर युद्धनौकेवर इस्रायलमध्ये विकसित झालेली मल्टीफंक्शन सर्व्हिलन्स थ्रेट अलर्ट रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे क्षेपणास्त्र विनाशक म्हणून मार्मागोवाला संबोधले जात आहे. विशाखापटणमच्या शृंखलेतील ही दुसरी युद्धनौका आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या वतीने नियोजित वेळेआधीच युद्धनौकेची बांधणी पूर्ण झाली असून, या कंपनीकडून सहा पाणबुड्याही बनविण्यात येणार आहेत. दरम्यान, या युद्धनौकेची बांधणी पूर्ण झाली असली तरी यावर क्षेपणास्त्रे बसविण्यात आलेली नाहीत. (प्रतिनिधी)>जगातील सर्व युद्धनौकांच्या तुलनेत मार्मागोवा ही युद्धनौका अधिक शक्तिशाली आहे. सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्मागोवा महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. मेक इन इंडियाच्या मोहिमेंतर्गत बांधण्यात आलेली ही दर्जेदार युद्धनौका आहे.- सुनील लांबा, प्रमुख अ‍ॅडमिरल, नौदल