शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
5
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
6
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
7
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
8
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
9
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव
10
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
11
Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन...
12
Diwali 2024: दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका 'या' सहा वस्तू; नात्यात येईल वितुष्ट!
13
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
14
Diwali 2024: आंघोळ आपण रोजच करतो, तरी दिवाळीत अभ्यंगस्नानाला एवढे महत्त्व का? वाचा!
15
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
16
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
17
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
18
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
19
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?

माथाडी कामगार, व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

By admin | Published: May 24, 2016 2:08 AM

फळे, भाजीपाला, कांदा व बटाटा बाजार समितीमधून वगळण्याचे सूतोवाच राज्य शासनाने करताच बाजार समित्यांमधील कामगार व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : फळे, भाजीपाला, कांदा व बटाटा बाजार समितीमधून वगळण्याचे सूतोवाच राज्य शासनाने करताच बाजार समित्यांमधील कामगार व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये मंगळवारी विशेष बैठक होणार असून, २५ मेपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. राज्य शासन बाजार समितीमधून भाजीपाला व फळे वगळण्याची अधिसुचना लवकरच काढणार असल्याचे समजताच मुंबई बाजार समितीमध्ये खळबळ उडाली आहे. ३० हजारपेक्षा जास्त मापाडी कामगार, १५हजारपेक्षा जास्त रोजंदारी कामगार, व्यापारी, त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी मिळून एक लाखपेक्षा जास्त नागरिकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. साखर, डाळी व इतर वस्तू यापूर्वीच बाजार समितीमधून वगळल्या आहेत. आता भाजीपाला व फळे वगळली तर मुंबई बाजार समिती बंद होवून माथाडी कामगार बेरोजगार होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून बाजार समितीच्या विरोधी भूमिका घेतली जात आहे. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारचे सूतोवाच केले होते. परंतु कामगारांनी आंदोलन केल्यानंतर माघार घेतली होती. आता पुन्हा बाजार समितीमधून वगळण्याची भूमिका घेतली जात असून त्याला तीव्र विरोध करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. बाजार समितीमधील व्यापारी व कामगार प्रतिनिधींची बैठक मंगळवारी माथाडी भवनमध्ये होणार आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. राज्यातील सर्वच बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार असल्याने राज्यव्यापी आंदोलन उभे केले जाणार आहे. २५ मे रोजी मुंबई बाजार समिती बंद ठेवून जाहीर मेळावा होणार असून त्यामध्ये आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. भाजपा सरकार सातत्याने बाजार समिती व कामगारांच्या विरोधात भूमिका घेत आहे. माथाडी कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाच्या विरोधात रोडवर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल. - नरेंद्र पाटील, सरचिटणीस, माथाडी संघटना