शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
2
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
3
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
4
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
5
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
7
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
8
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
10
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
11
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
12
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
13
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
14
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
15
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
16
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
17
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
18
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
19
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
20
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार

मातृतीर्थ जिल्ह्यात ‘बेटी बचाओ’ अभियानाला नख

By admin | Published: November 14, 2016 11:07 PM

राष्ट्रीय जिजाऊं मॉ साहेबांच्या जन्माने पावन झालेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातच जिजाऊंच्या लेकींना जन्म घेण्यापूर्वीचमारून टाकण्यात येत असल्याचे भिषण वास्तव समोर आले आहे.

सुधीर चेके पाटील
चिखली, दि. 14 : राष्ट्रीय जिजाऊं मॉ साहेबांच्या जन्माने पावन झालेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातच जिजाऊंच्या लेकींना जन्म घेण्यापूर्वीचमारून टाकण्यात येत असल्याचे भिषण वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एकूण १२३ गावांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर ७० टक्यांऐवढा असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे.
 जिल्ह्यातील १२३ गावांमधील ३९ गावे एकट्या चिखली तालुक्यातील असून मातृशक्तीचा उदोउदो करणाºया समस्त जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत लांछनास्पद आहे. तथापी स्त्री जन्मदर वाढावा यासाठी शासनाव्दारे राबविण्यात येणाºया
विविध योजना देखील जिल्ह्यात यशस्वीपणे राबविल्या जात नसल्याचे यातून निष्पन्न होत असून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ची व्याप्ती वाढविणे नितांत गरजेचे आहे.
 
स्त्रीभ्रूण हत्या हे फार मोठे पाप आहे. ही मानिसकता थांबविण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. मुली, माता आणि भगिणींचे रक्षण व्हायलाच हवे. यात धर्माचा विचार व्हायलाच नको, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुंदेलखंड प्रांतातील महोबा येथे विशाल महापरिवर्तन रॅलीला संबोधित करताना सांगितले आहे. समाजातील स्त्रीभ्रूण हत्येच्या मानिसकतेवरही
त्यांनी सडकून टीका केली होती. तर स्त्रीभृण हत्या रोखण्यासाठी तसेच कोणत्याही वर्गातील पालकाला मुलीचे ओझे वाटू नये यासाठी मुलगीच हीच वंशाचा दिवा आहे हे बिबंवून देत मुलींच्या कल्याणार्थ अनेक योजना सरकारने हाती घेतल्या आहेत. मात्र, या योजनाअंतर्गत करावयाची कामे, उपाय-योजना तसेच व्यापक जनजागृती केवळ कागदावर होत असल्याचे चित्र सबंध जिल्ह्यात आजघडीला दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ‘ ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून बेटी बचाओ, बेटी पढाओ  या अभियानाकडे पाहिल जातं.
 
२२ जानेवारी २०१५ पासून या अभियानाला सुरूवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यात या अभियानाची एैशीतैशी होवून हे अभियान केवळ ‘सरकारी काम’ बनून राहिल्याने माँ जिजाऊंच्या जन्मभूमीत त्यांच्या लेकींना गर्भातच नख लावून मारल्या
जात आहे. परिणामी जिल्ह्यातील १२३ गावांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या ३० टक्याने कमी आहे. या १२३ गावांपैकी ३९ गावे एकट्या चिखली तालुक्यातील आहेत.
 
मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या समतोल राहावी यासाठी २२ जानेवारी २०१५ पासून राबविण्यात येत असलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाच्या काळातीलच ही आकडेवारी असून चिखली तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य
केंद्रातील किन्होळा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सातगाव भुसारी, सोनेवाडी, हातणी, सवणा, तांबुळवाडी, अंत्रीकोळी आणि गोद्री या ७ गावांमध्ये सन २०१४-१५ मध्ये १२४ मुलांमागे ११५ मुलींची संख्या होती तर सन २०१५-१६ मध्ये आतापर्यंत १५१ मुलांमागे १०८ मुलींची संख्या आहे.
 
 
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाकडे केवळ घोषणा व सरकारी काम यादृष्टीने पाहल्या जात असल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता या संदर्भातली जनजागृती करण हे केवळ सरकारी काम नसून त्याला विविध पक्ष, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांची जोड आवश्यक असल्याने जिल्हाभरातील सर्व स्वयंसेवी संस्था, संघटना, मित्रमंडळे, पक्ष-संघटनांही
स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे.